Homeपब्लिक फिगरपुढच्या काळात फक्त...

पुढच्या काळात फक्त केंद्राच्याच निवडणुका!

येणारे वर्ष निवडणुकांचे असून यावेळी आपण चुकलो तर देशातून लोकशाही गायब होईल. आगामी काळात केवळ केंद्रातील निवडणुका होतील, राज्यातील निवडणुका होणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पार्टीवर केली. केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमाच्या विरोधात आम्ही आम आदमी पार्टीबरोबर आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, खासदार राघव चड्ढा, संजय सिंह आदी उपस्थित होते. यानंतर ठाकरे आणि  केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

शिवसेना आणि मातोश्री नाते जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही लोक राजकारण करतात, पण आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाते जपतो. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्णय दिले. त्यात एक शिवसेनेबाबत आणि दुसरा दिल्ली सरकारबाबत आहे. लोकशाहीमध्ये सर्वात जास्त महत्त्व लोकप्रतिनिधींना असायला हवे. दिल्ली सरकारबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु त्याविरोधात केंद्राने वटहुकूम आणला. ही लोकशाही आहे का? जर हे असेच सुरू राहिले तर यापुढे केवळ केंद्राच्या निवडणुका होतील, राज्याच्या निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे जनतेला झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

केंद्र सरकार सुप्रीम कोर्टालाही जुमानत नाही- अरविंद केजरीवाल

दिल्लीतील लोकांनी आपल्या अधिकारांसाठी आजवर मोठी लढाई लढली. फेब्रुवारी २०१५मध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनले. त्यानंतर तीन महिन्यात मे २०१५मध्ये केंद्राने एक आदेश जारी करत सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले. अखेर ८ वर्षे लढा दिल्यानंतर कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत केंद्राने वटहुकूम जारी करून आमचे अधिकार काढून घेतले. याचा अर्थ केंद्रातील सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाही जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिले, असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे आणि केवळ दिल्लीची नाही तर देशातील सर्व राज्यांची, जनतेची लढाई आहे. विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याच्या भाजपाच्या तीन पद्धती आहेत. जेथे भाजपा सरकार नाही तेथे आमदार खरेदी करून सरकार पाडले जाते. जिथे आमदार विकले जात नाहीत तेथे केंद्रीय तपासयंत्रणांची भीती दाखवून आमदार फोडून सरकार पाडले जाते. तिसरी पद्धत दिल्लीप्रमाणे तेथील सरकारचे सर्व अधिकार अध्यादेश आणून काढायचे. केंद्रातील भाजपाचा अहंकार वाढला आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content