Homeपब्लिक फिगरपुढच्या काळात फक्त...

पुढच्या काळात फक्त केंद्राच्याच निवडणुका!

येणारे वर्ष निवडणुकांचे असून यावेळी आपण चुकलो तर देशातून लोकशाही गायब होईल. आगामी काळात केवळ केंद्रातील निवडणुका होतील, राज्यातील निवडणुका होणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पार्टीवर केली. केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमाच्या विरोधात आम्ही आम आदमी पार्टीबरोबर आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, खासदार राघव चड्ढा, संजय सिंह आदी उपस्थित होते. यानंतर ठाकरे आणि  केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

शिवसेना आणि मातोश्री नाते जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही लोक राजकारण करतात, पण आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाते जपतो. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्णय दिले. त्यात एक शिवसेनेबाबत आणि दुसरा दिल्ली सरकारबाबत आहे. लोकशाहीमध्ये सर्वात जास्त महत्त्व लोकप्रतिनिधींना असायला हवे. दिल्ली सरकारबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु त्याविरोधात केंद्राने वटहुकूम आणला. ही लोकशाही आहे का? जर हे असेच सुरू राहिले तर यापुढे केवळ केंद्राच्या निवडणुका होतील, राज्याच्या निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे जनतेला झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

केंद्र सरकार सुप्रीम कोर्टालाही जुमानत नाही- अरविंद केजरीवाल

दिल्लीतील लोकांनी आपल्या अधिकारांसाठी आजवर मोठी लढाई लढली. फेब्रुवारी २०१५मध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनले. त्यानंतर तीन महिन्यात मे २०१५मध्ये केंद्राने एक आदेश जारी करत सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले. अखेर ८ वर्षे लढा दिल्यानंतर कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत केंद्राने वटहुकूम जारी करून आमचे अधिकार काढून घेतले. याचा अर्थ केंद्रातील सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाही जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिले, असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे आणि केवळ दिल्लीची नाही तर देशातील सर्व राज्यांची, जनतेची लढाई आहे. विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याच्या भाजपाच्या तीन पद्धती आहेत. जेथे भाजपा सरकार नाही तेथे आमदार खरेदी करून सरकार पाडले जाते. जिथे आमदार विकले जात नाहीत तेथे केंद्रीय तपासयंत्रणांची भीती दाखवून आमदार फोडून सरकार पाडले जाते. तिसरी पद्धत दिल्लीप्रमाणे तेथील सरकारचे सर्व अधिकार अध्यादेश आणून काढायचे. केंद्रातील भाजपाचा अहंकार वाढला आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content