Homeब्लॅक अँड व्हाईटगोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो...

गोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो सोमवारी भेटीच्या वेळा बदला..

केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अर्जदारांना त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याची विनंती केली आहे.

केंद्र सरकारची सर्व कार्यालये 22 जानेवारी 2024 रोजी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील. हे लक्षात घेऊन, गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने पारपत्र अर्जदारांना विनंती केली आहे ज्यांनी 22 जानेवारी 2024 (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) पणजीतील पारपत्र सेवा केंद्र आणि मडगाव येथील पोस्ट ऑफिस पारपत्र  सेवा केंद्र येथे पारपत्रासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे त्यांनी त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित कराव्या, अशी  विनंती केली आहे. भेटीच्या वेळेचे पुनर्निर्धारण अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करून किंवा एमपासपोर्ट सेवा मोबाइल ॲप वापरून केले जाऊ शकते.

प्रभावित अर्जदारांच्या सोय सुनिश्चित करण्यासाठी या सुट्टीमुळे ज्यांच्या भेटी रद्द झाल्या आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त भेटीचा प्रयत्न उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

Continue reading

१८व्या ‘जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले’ मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या "जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले" मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा मंदीर, वडाळा, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झाल्या. ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील वयोगटात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री...

मुंबईत भाजपाला मिळाली सुमारे २२ टक्के मते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाच्या मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी...
Skip to content