Homeबॅक पेजडॅशिंग स्पोर्ट्स क्लबने...

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने पटकावली घोष ट्रॉफी!

खुशी निजाई (नाबाद ६०) आणि लेग स्पिनर श्रेया सुरेश (१८ धावात ४ बळी) या दोघींच्या शानदार प्रदर्शनामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी सहज पराभव करून चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या अधिकृत स्पर्धेमध्ये आठ संघांचा सहभाग होता. स्पोर्टिंग युनियन, कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

डॅशिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली. पण काही वेळातच उण्यापुऱ्या २० धावांवर त्यांनी तीन विकेट गमावल्या. त्यानंतर खुशीच्या खेळीमुळे त्यांना ५ बाद १३६ धावांचा पल्ला गाठता आला. खुशीने बचाव आणि आक्रमण यांचा मिलाफ साधत ४५ चेंडूत ६० धावा काढल्या. त्यात तिने ८ चौकार मारले. तिने ईशिका जगताप (२२) हिच्यासह चौथ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

प्रथम दर्शनी काहीशी कमी वाटणारी डॅशिंगची धावसंख्या मग फारच मोठी भासू लागली. कारण एमआयजीचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे धावगतीपण मंदावली. डॅशिंगच्या श्रेया सुरेशने १३व्या षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स घेत एमआयजीची ७ बाद ६१ अशी अवस्था करताच विजेतेपदाचा निकाल लागून गेला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू पूनम राऊत, युरोपेमचे कंट्रीहेड बी. सी. पटेल तसेच एमसीएचे अभय हडप यांच्या हस्ते संपन्न झाला.

संक्षिप्त धावफलक

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबः २० षटकांमध्ये ५ बाद १३६ (खुशी निजाई नाबाद ६०, ईशिका जगताप २२, हर्षी पुरस्नानी १७/३, ख्याती स्वेन २०/२)

विजयी विरुद्ध

एमआयजी क्रिकेट क्लबः १९.५ षटकात सर्वबाद ८८ (हिर कोठारी १९, श्रेया सुरेश १८/४)

सामन्यात सर्वोत्तमः श्रेया सुरेश

स्पर्धेत सर्वोत्तमः महेक मिस्त्री (एमआयजी)

सर्वोत्तम फलंदाजः रिया पवार (युरोपेम)

सर्वोत्तम गोलंदाजः त्रिशा नायर (डॅशिंग)

स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूः किंजल कुमारी (साईनाथ)

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content