Homeबॅक पेजडॅशिंग स्पोर्ट्स क्लबने...

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने पटकावली घोष ट्रॉफी!

खुशी निजाई (नाबाद ६०) आणि लेग स्पिनर श्रेया सुरेश (१८ धावात ४ बळी) या दोघींच्या शानदार प्रदर्शनामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी सहज पराभव करून चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या अधिकृत स्पर्धेमध्ये आठ संघांचा सहभाग होता. स्पोर्टिंग युनियन, कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

डॅशिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली. पण काही वेळातच उण्यापुऱ्या २० धावांवर त्यांनी तीन विकेट गमावल्या. त्यानंतर खुशीच्या खेळीमुळे त्यांना ५ बाद १३६ धावांचा पल्ला गाठता आला. खुशीने बचाव आणि आक्रमण यांचा मिलाफ साधत ४५ चेंडूत ६० धावा काढल्या. त्यात तिने ८ चौकार मारले. तिने ईशिका जगताप (२२) हिच्यासह चौथ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

प्रथम दर्शनी काहीशी कमी वाटणारी डॅशिंगची धावसंख्या मग फारच मोठी भासू लागली. कारण एमआयजीचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे धावगतीपण मंदावली. डॅशिंगच्या श्रेया सुरेशने १३व्या षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स घेत एमआयजीची ७ बाद ६१ अशी अवस्था करताच विजेतेपदाचा निकाल लागून गेला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू पूनम राऊत, युरोपेमचे कंट्रीहेड बी. सी. पटेल तसेच एमसीएचे अभय हडप यांच्या हस्ते संपन्न झाला.

संक्षिप्त धावफलक

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबः २० षटकांमध्ये ५ बाद १३६ (खुशी निजाई नाबाद ६०, ईशिका जगताप २२, हर्षी पुरस्नानी १७/३, ख्याती स्वेन २०/२)

विजयी विरुद्ध

एमआयजी क्रिकेट क्लबः १९.५ षटकात सर्वबाद ८८ (हिर कोठारी १९, श्रेया सुरेश १८/४)

सामन्यात सर्वोत्तमः श्रेया सुरेश

स्पर्धेत सर्वोत्तमः महेक मिस्त्री (एमआयजी)

सर्वोत्तम फलंदाजः रिया पवार (युरोपेम)

सर्वोत्तम गोलंदाजः त्रिशा नायर (डॅशिंग)

स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूः किंजल कुमारी (साईनाथ)

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content