Homeएनसर्कलमौनी अमवास्येनिमित्त साडेचार...

मौनी अमवास्येनिमित्त साडेचार लाख भाविकांनी केला रेल्वे प्रवास

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येनिमित्त 244 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या, ज्यातून फक्त दोन आठवड्यांत साडेचार लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 18 जानेवारीला प्रयागराजमध्ये 40 विशेष गाड्यांनी नियमित सेवांमध्ये कोणताही व्यत्यय न आणता 1 लाख प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध केली.

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या काळात रेल्वे वाहतुकीचे यशस्वी व्यवस्थापन केले. 3 जानेवारीपासून देशभरात 244 विशेष रेल्वेगाड्या चालवून भाविकांसाठी सुरळीत प्रवासाची खात्री केली. उत्तर रेल्वेवर 31, उत्तरमध्य रेल्वेवर 158 आणि पूर्वोत्तर रेल्वेवर 55 अशा विशेष रेल्वेगाड्यांमधून सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. सणासुदीच्या काळात त्रासमुक्त आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले होते.

18 जानेवारीला प्रयागराजमध्ये सणासुदीच्या प्रवासाचा उच्चांक दिसून आला. उत्तर रेल्वेवर 11, उत्तरमध्य रेल्वेवर 22 तर पूर्वोत्तर रेल्वेवर 7 गाड्यांसह एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्यातून अंदाजे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व नियमित गाड्या नियोजित वेळेनुसार धावल्या. या विशेष गाड्यांचे यशस्वी परिचालन सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा प्रदान करण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रवासी वाहतूक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान, संसाधन नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयाचा वापर करत आहे.

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content