Homeएनसर्कलमौनी अमवास्येनिमित्त साडेचार...

मौनी अमवास्येनिमित्त साडेचार लाख भाविकांनी केला रेल्वे प्रवास

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येनिमित्त 244 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या, ज्यातून फक्त दोन आठवड्यांत साडेचार लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 18 जानेवारीला प्रयागराजमध्ये 40 विशेष गाड्यांनी नियमित सेवांमध्ये कोणताही व्यत्यय न आणता 1 लाख प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध केली.

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या काळात रेल्वे वाहतुकीचे यशस्वी व्यवस्थापन केले. 3 जानेवारीपासून देशभरात 244 विशेष रेल्वेगाड्या चालवून भाविकांसाठी सुरळीत प्रवासाची खात्री केली. उत्तर रेल्वेवर 31, उत्तरमध्य रेल्वेवर 158 आणि पूर्वोत्तर रेल्वेवर 55 अशा विशेष रेल्वेगाड्यांमधून सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. सणासुदीच्या काळात त्रासमुक्त आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले होते.

18 जानेवारीला प्रयागराजमध्ये सणासुदीच्या प्रवासाचा उच्चांक दिसून आला. उत्तर रेल्वेवर 11, उत्तरमध्य रेल्वेवर 22 तर पूर्वोत्तर रेल्वेवर 7 गाड्यांसह एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्यातून अंदाजे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व नियमित गाड्या नियोजित वेळेनुसार धावल्या. या विशेष गाड्यांचे यशस्वी परिचालन सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा प्रदान करण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रवासी वाहतूक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान, संसाधन नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयाचा वापर करत आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....
Skip to content