Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज एकीकडे पाण्याचा तर दुसरीकडे शब्दांचा मारा!

बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल, हा टास्क सुरू आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत.

आज मोटर बाईकवर बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरुद्ध टीम, जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. बघूया हा टास्क कसा रंगणार? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईकवर बसू शकतील? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील?

विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचं पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कुठल्याकुठल्या प्रकारचे प्रयत्न करणार हे बघायला रंजक ठरेल.

टास्कदरम्यान अक्षय आणि विशालमध्ये पडणार आहे वादाची ठिणगी. अक्षयच्या अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये होणार आहे बाचाबाची.. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत..”. आता हा वाद कुठे थांबणार? पुढे काय होणार? बघूया आजच्या भागात..

हल्लाबोल टास्कमुळे खूपच तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. पण, दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकंफुलकं करण्याचं काम सुरुवातीपासून करत आहेत. कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी..

आज बिग बॉसच्या घरात रंगणार आहे यमकाची जुगलबंदी. त्याची सुरुवात आविष्कारपासून झाली. आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली. पण त्यात पाणीच ठेवायला विसरला म्हणे.. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली..

“आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट”

त्यावर मग तृप्ती देसाईदेखील म्हणाल्या, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”.

दादुस लगेच म्हणाले, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक”..

त्यावर मग सोनालीनेदेखील करते वाक्य “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक”.

तृप्तीताईंना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवलं असणार.

त्या म्हणाल्या “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक”?

आणि असे अनेक यमक सदस्य जुळवत केले. ही जुगलबंदी दादुस, तृप्ती देसाई,  मीनल, सोनाली, आविष्कार या सदस्यांमध्ये रंगतेय.

पुढे काय होते ते पाहुया बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात. आज रात्री.. कलर्स मराठीवर..

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content