Homeन्यूज ॲट अ ग्लांसबिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण केल्या असून ते आता आपल्या संबंधित मतदारसंघांमध्ये परतले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तसेच 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. घटनेतल्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951च्या कलम 20ब अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करतो. निवडणूक आयोगाने निरीक्षकांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बारकाईने पाहण्याचे आणि निवडणुका पारदर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

निरीक्षकांना सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्याशी पूर्णतः संपर्कात राहण्याचे व त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निरीक्षकांना मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने घेतलेल्या नव्या उपक्रमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

Continue reading

बंगालमध्ये कांटे की टक्कर तर, केरळमध्ये सत्तांतराचे संकेत

पश्चिम बंगालमधील मतदानाचा शेवटचा टप्पा बुधवारी पार पडल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये 'भाजप' आणि 'तृणमूल काँग्रेस'मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे तर, केरळमध्ये सत्तापालटाचे संकेत मिळत आहेत. आसाम, पश्चिम बंगाल,...

फलोदी सट्टाबाजार देतोय बंगालमध्ये सत्तापालटाचे संकेत

विधानसभा निवडणुका २०२६साठी फलोदी सट्टाबाजाराचा अंदाज एक्झिट पोल्सच्या अनुसरूनच दिसत आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांपूर्वी फलोदी सट्टेबाजीचा बाजार जोरात सुरू आहे. नवीनतम दर आणि अंदाज पश्चिम बंगालमध्ये बदलाचे संकेत देत...

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...
Skip to content