Homeकल्चर +उद्या अनुभवा ना....

उद्या अनुभवा ना. धों. महानोरांचे साहित्य संचित!

मुंबईच्या विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साठ्ये महाविद्यालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित ‘महानोरांचे साहित्य संचित’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये ना. धों. महानोर यांच्या गाजलेल्या कविता, रानगाणी, त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या संपर्कातील मान्यवरांच्या आठवणी यामधून त्यांना आदरांजली वाहिली जाईल.

याप्रसंगी कवी अरुण म्हात्रे आपल्या कवी, गायक, वादक साथीदारांसह महानोरांच्या काही कविता आणि गाणी सादर करतील. प्रमुख वक्ते म्हणून पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, कवी-लेखक रवींद्र

आवटी, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे,  डॉ. कृष्णा नाईक,  कवी-अभिनेता प्रकाश राणे, गुरुनाथ तेंडुलकर, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, संपदा पाडगावकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समीर जाधव करतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content