Homeकल्चर +फैयाज शेख यांना...

फैयाज शेख यांना ‘रंगकर्मी सन्मान’!

रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना ‘रंगकर्मी सन्मान’ तर सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी ‘चतुरंग’ संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर यांना ‘ध्यास सन्मान’ पुरस्कार ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

अॅड फिझ ही संस्था गेली १५ वर्षे ‘चैत्रचाहूल’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम करते. त्याचबरोबर सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीला ‘ध्यास सन्मान’ देऊन आणि रंगभूमीवरील मोलाच्या योगदानाबद्दल ‘रंगकर्मी सन्मान’ प्रदान करून समाजभानही जपते. या वर्षी हे सन्मान चतुरंग संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार स्वीकारल्यावर प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख म्हणाल्या की, चैत्रचाहूलच्या परिवाराने मला हा ‘रंगकर्मी सन्मान’ पुरस्कार दिला, हे पाहून खूप बरं वाटलं. आपण जे काही केलं आहे त्याची लोकांना जाणीव आहे, हे पाहून आनंद होतो.  ‘चैत्र चाहूल’ला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत, या पुरस्काराच्या निमित्तानं मी प्रथमच या व्यासपीठावर आली आहे. मला यानिमित्तानं आपल्यासमोर रसिकांच्या आवडीचे गाणे सादर करण्याचा योग आला आहे. मी आपल्या सर्वांना यानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवाद देऊ इच्छिते.

‘ध्यास सन्मान’ स्वीकारल्यावर विद्याधर निमकर म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही. एक व्यक्ती कुठल्यातरी गोष्टीचा ‘ध्यास’ डोळ्यासमोर धरते. मात्र त्यासाठी अनेकांची ‘आस’ सोबत असावी लागते. हा सन्मान ‘चतुरंग’च्या असंख्य कार्यकर्त्यांचा, स्नेहींचा आहे.

मुंबईत शिवाजीमंदिर येथे रंगलेला हा कार्यक्रम पत्रकार आणि संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवन देणारे नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना समर्पित होता. त्यांच्या नाटकातील पदे वैशाली भडकमकर व सहकारी यांनी भरतनाट्यम या माध्यमातून, पेंढारकर व सुवर्णा कागल यांनी ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकातील प्रसंग सादर करून आणि गोखले यांचे नातू ओंकार दादरकर व संपदा माने यांच्या गायनातून सादर झाली. विवेक व्यासपीठाच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधत अजित दांडेकर यांनी पोडियमला दिलेले ऑर्गनचे रूप कौतुकास्पद आणि लक्षणीय होते. अरुण जोशी यांची संहिता जुन्या संदर्भांचे दाखले देणारी, माहितीपूर्ण होती. संपदा कुळकर्णी व प्रमोद पवार यांच्या उत्कृष्ट निवेदनातून ती सादर झाली. कार्यक्रमाची भैरवी फैयाज यांनी गायल्याने कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. महेंद्र पवार यांच्या संयोजनात एक उत्तम कार्यक्रम घडल्याची प्रतिक्रिया रसिक देत होते.

Continue reading

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे...

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक...

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...
Skip to content