Homeचिट चॅटआज मिळणार अर्थसंकल्पाच्या...

आज मिळणार अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाची मेजवानी!

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत येत्या वर्षाचा म्हणजेच २०२२-२३ सालचा अर्थसंकल्प सादर केला. आज संध्याकाळी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता दोन्ही कार्यक्रम ऑनलाईन होतील. जनतेने यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रमा प्रकाशनाने केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषणाचा (फलश्रुति) कार्यक्रम आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि पूर्वेश शेलटकर हे या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतील. इंडियन आँईल काँरपोरेशन, बीएस ई आय ई एफ आणि एनकेजीएसबी बँक यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले आहे.

मिती क्रियेशन्स फेसबुक लाईव्हवर सायंकाळी ६ वा. सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि रमा प्रकाशनचे संचालक प्रकाश कुलकर्णी यांनी केले आहे. मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/mitigroup) आणि मिती ग्रुप डिजिटल या युट्यूब चॅनलवर हे विश्लेषण पाहता येईल.

सावरकर स्मारकातर्फेही होणार अर्थसंकल्पाचे विश्लेषण

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे केले जाणारे अर्थसंकल्प लाइव्ह विश्लेषण आज, बुधवारी २ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे. अर्थसंकल्पाचे विश्लेषण डॉ. नरेंद्र जाधव थेट करणार आहेत. त्यासाठी https://www.youtube.com/user/SavarkarSmarak या लिंकवर जाऊन डॉ. जाधव यांनी केलेले अर्थसंकल्पावरील भाष्य पाहता येईल. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

व्यापार, सूक्ष्म, लघु उद्योगांच्या पदरी निराशा – महाराष्ट्र चेंबर

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी तितकासा आशादायक नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्याचबरोबर केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे व शेती क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यापार, उद्योगाला होणार आहे. सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाचे वर्णन करायचं झालं तर शेती व पायाभूत सुविधांच्यावर भर देणारा संमिश्र अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे.  

व्यापार आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रं गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडामध्ये फार मोठ्या नुकसानीला सामोरे गेले आहे. या दोन्ही क्षेत्रासाठी सरकार कोणती ना कोणती थेट मदतीची योजना लागू करेल अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा मात्र या अर्थसंकल्पात पूर्ण झाली नाही. मात्र शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, नऊ लाख हेक्टर नवीन जमीन शेतीखाली आणणे याबरोबरच शेतीला एमएसपीसाठी दोन लाख कोटींची तरतूद या काही चांगल्या गोष्टी शेतीच्या विकासासाठी केल्या आहेत. अजूनही बरेच काही करता येणे शक्य आहे. ते सरकार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्टार्टअप इंडस्ट्रीला इन्कमटॅक्सचा इन्सेन्टिव्ह १ वर्षाने वाढवून दिला. अर्थात कोरोनामुळे ते वाढवून देणे क्रमप्राप्तच होते. याबरोबर कृषी क्षेत्रातल्या स्टार्टअपसाठी नाबार्डकडून थेट कर्जपुरवठा करण्याचा निर्णय अतिशय चांगली गोष्ट आहे. नाबार्डकडून हा कर्जपुरवठा होताना सहज, सुटसुटीत व कमी व्याजदरात होणे अपेक्षित आहे. नाबार्डच्या नेहमीच्या बँकिंग पद्धतीने तो करून चालणार नाही तर व्हेंचर कॅपिटल व एन्जल गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हा कर्जपुरवठा स्टार्टअपला मिळाला तर त्याला खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे. कृषी क्षेत्राच्या स्टार्टअपसाठी नाबार्डने दिलेले अर्थसहाय्य कृषी क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार असून तरुणांना नवीन संकल्पना साकार करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे, असेही गांधी म्हणाले.  

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content