Homeकल्चर +उद्या विनामूल्य आनंद...

उद्या विनामूल्य आनंद घ्या ‘शतजन्म शोधिताना’…

मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकात उद्या म्हणजेच रविवारी, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीदिनी ‘शतजन्म शोधिताना’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम होत आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई उत्कर्ष मंडळ यांनी याचे आयोजन केले आहे. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड यांनी याची निर्मिती केली आहे. स्वा. सावरकर यांची अलौकिक काव्यप्रतिभा आणि त्यांचे कार्यकर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवणारा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. रविवारी, २८ मे २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता स्वा. सावरकर स्मारकाच्या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांसाठी स्वा. सावरकर स्मारकाच्या ९२२००७०३८६, या क्रमांकावर किंवा हरिश्चंद्र शिंदे यांच्याशी ९०८२३४५७२९ क्रमांकावर संपर्क साधावा. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठी आधी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.

स्वा. सावरकर यांच्या विविध प्रकारच्या कविता, गीते यांचे संगीतबद्ध सादरीकरण करून त्यावर नृत्याचाही अविष्कार करीत हा ‘शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम प्रेक्षकांना, रसिकांना आणि सावरकरप्रेमींना खिळवून ठेवतो. याची संकल्पना संहिता आणि निवेदन मंजिरी मराठे यांचे असून संगीत दिग्दर्शन वर्षा भावे आणि नृत्य दिग्दर्शन डॉ. रुपाली देसाई यांचे आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. सावरकरांच्या अलौकिक अशा प्रतिभेचा शोध यानिमित्ताने घेतला गेला आहे.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content