Homeकल्चर +डॉ. संजय उपाध्ये...

डॉ. संजय उपाध्ये यांचा सोमवारी ‘मन करा रे प्रसन्न’!

मुंबईतल्या लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा मन उल्हासित करणारा अनोखा मनोरंजक असा ‘मन करा रे प्रसन्न’ हा कार्यक्रम येत्या सोमवारी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी, २० मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता स्वा. सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, राम मंदिर रस्ता, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारखे अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. आपले विचारच आपल्याला घडवत असतात. तसेच आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व आपले विचारच करत असतात. माणसाच्या दुःखाचे मूळ त्याच्या चुकीच्या विचारपद्धतीत शोधून आयुष्य कसे जगावे, अशी नवी हास्यथेरपी डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण समाजासमोर मांडली आहे. या कार्यक्रमाचा वेग तासाला ६० स्माईल्स इतका आहे.

आपण बिनशर्त स्वतःचा स्वीकार करून स्वतःकडून टोकाच्या अपेक्षा करण्यापेक्षा हे भयंकर आहे, परंतू एव्हढेही वाईट नाही असा विचार करावा. अतिरेकी विचारांचा ताबा विवेकनिष्ठ विचारांना घेऊ द्यावा. असे केल्यास आनंदाने जगणे निवडता येऊ शकते. स्वतःचा माणूस म्हणून स्वीकार करुन स्वतःवर प्रेम करा. आयुष्य कसे जगावे असे सांगणारा एक नॉनअध्यात्मिक प्रवचन, ज्ञान, अध्यात्म, मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम असलेला हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह महेश काळे व डॉ. रश्मी फडणवीस यांनी केले आहे.

Continue reading

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे...

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक...

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...
Skip to content