Homeकल्चर +शनिवारी आनंद घ्या...

शनिवारी आनंद घ्या सौमित्र यांच्या गप्पांचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध अभिनेता आणि कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे संवादक राजीव श्रीखंडे हे आहेत. स्व. वासुदेव व नलिनी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या कार्यक्रमाला विद्या धामणकर यांनी सहाय्य केले आहे.

किशोर कदम हे अतिशय संवेदनशील अभिनेते म्हणून गाजलेले असून त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमधे तसेच मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ‘आणि तरीही मी’ हा त्यांचा कवितासंग्रह खूप लोकप्रिय झाला आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ते कविता वाचनाचे कार्यक्रमही करतात. त्यांच्या गीतांचा गारवा हा आल्बम खूप गाजला.

संवादक राजीव श्रीखंडे हे जागतिक साहित्याचे अभ्यासक असून ग्रंथालीच्या ग्लोबल साहित्य सफरमधून जगातल्या अजरामर साहित्यकृतींचा परिचय ते करून देतात. ते श्रीखंडे कन्सल्टंट्स या ख्यातनाम आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक असून दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे खजिनदार म्हणूनही कार्यरत आहेत. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांसाठी थोडा वेळ देण्यात येईल. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार...
Skip to content