Thursday, January 23, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे...

ठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे बळावले मणक्यांचे आजार!

ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले आहेत. उज्वल उद्यासाठी मेट्रो येणार आहे. त्याचे स्वागतच आहे. पण मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले खड्डे महिनोमहीने तसेच ठेवल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना मणकादुखीचे आजार बळावत असल्याचे अनेकांनी सांगितले.

छायाचित्रात दिसणारे खड्डे हे घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या सेवा रस्त्यावरील आहेत. तेथे मेट्रोचे काम सुरु आहे हे मान्य आहे. पण हे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. म्हणून काय नागरिकांनी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यन्त या खड्ड्यातूनच जायचे? याबद्दल ठाणे महापालिका व विकास प्राधिकरणाने एकदा खुलासा केलेला बरा! म्हणजे मग दररोज खड्ड्याबाबत कोणी तक्रार करणार नाही.

तसाही नागरिकांना बरेच आवंढे गिळण्याची सवय आहेच. त्यात आणखी एकाची भर पडली हे पाहून बापुडे नागरिक गप्प तरी बसतील. नगरविकास खात्याचे सचिव, प्राधिकरणाचे सर्वेसर्वा आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी संयुक्तपणे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करावी व संबंधित अभियंत्यांना कामाला लावावे अशी जनतेची मागणी आहे.

Continue reading

बीडच्या आयपीएसला गायब केले, तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल करा हवा तो राडा धमाल करण्याचा जमाना आहे बिनधास्त करा, बलात्कार -भ्रष्टाचार - अत्याचार - भरसभेत -...

अजितदादांना नामोहरम करण्याचा भाजपचा प्रयत्न?

गेले सुमारे सव्वा महिना राज्यभर गाजत असलेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याप्रकारण संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना व त्यात अपेक्षित यश दृष्टीपथात असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा आरोपाचा 'नगारा' सतत का वाजत आहे, असा प्रश्न राजकीय...

सरपंच हत्त्याप्रकरण होणार शांत? बंधूंना देणार सरपंचपद??

गेले सुमारे महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्त्या प्रकरण लवकरच संपुष्टात येईल असे दिसते. याप्रकरणी दिल्लीवरून पुढाकार घेण्यात आल्याने राज्यातील नेत्यांचा नाईलाज झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान देशमुख कुटुंबाने याप्रकरणी उच्च न्यायालयात...
Skip to content