Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे...

ठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे बळावले मणक्यांचे आजार!

ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले आहेत. उज्वल उद्यासाठी मेट्रो येणार आहे. त्याचे स्वागतच आहे. पण मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले खड्डे महिनोमहीने तसेच ठेवल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना मणकादुखीचे आजार बळावत असल्याचे अनेकांनी सांगितले.

छायाचित्रात दिसणारे खड्डे हे घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या सेवा रस्त्यावरील आहेत. तेथे मेट्रोचे काम सुरु आहे हे मान्य आहे. पण हे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. म्हणून काय नागरिकांनी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यन्त या खड्ड्यातूनच जायचे? याबद्दल ठाणे महापालिका व विकास प्राधिकरणाने एकदा खुलासा केलेला बरा! म्हणजे मग दररोज खड्ड्याबाबत कोणी तक्रार करणार नाही.

तसाही नागरिकांना बरेच आवंढे गिळण्याची सवय आहेच. त्यात आणखी एकाची भर पडली हे पाहून बापुडे नागरिक गप्प तरी बसतील. नगरविकास खात्याचे सचिव, प्राधिकरणाचे सर्वेसर्वा आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी संयुक्तपणे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करावी व संबंधित अभियंत्यांना कामाला लावावे अशी जनतेची मागणी आहे.

Continue reading

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...
Skip to content