Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे...

ठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे बळावले मणक्यांचे आजार!

ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले आहेत. उज्वल उद्यासाठी मेट्रो येणार आहे. त्याचे स्वागतच आहे. पण मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले खड्डे महिनोमहीने तसेच ठेवल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना मणकादुखीचे आजार बळावत असल्याचे अनेकांनी सांगितले.

छायाचित्रात दिसणारे खड्डे हे घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या सेवा रस्त्यावरील आहेत. तेथे मेट्रोचे काम सुरु आहे हे मान्य आहे. पण हे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. म्हणून काय नागरिकांनी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यन्त या खड्ड्यातूनच जायचे? याबद्दल ठाणे महापालिका व विकास प्राधिकरणाने एकदा खुलासा केलेला बरा! म्हणजे मग दररोज खड्ड्याबाबत कोणी तक्रार करणार नाही.

तसाही नागरिकांना बरेच आवंढे गिळण्याची सवय आहेच. त्यात आणखी एकाची भर पडली हे पाहून बापुडे नागरिक गप्प तरी बसतील. नगरविकास खात्याचे सचिव, प्राधिकरणाचे सर्वेसर्वा आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी संयुक्तपणे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करावी व संबंधित अभियंत्यांना कामाला लावावे अशी जनतेची मागणी आहे.

Continue reading

मुंब्रा अपघातानंतर अभियांत्रिकी ज्ञान पाजळायचे कारण काय?

एप्रिल महिन्याच्या मध्यास इथेच आम्ही 'काही सेकंदात' दुसरी लोकल गाडी धावणार, या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली हॊती. तीच गत सध्या मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातासंदर्भात सरकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते पुन्हा करत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. एका वळणावर...

नेत्यांची सुरक्षा बघणार की गस्त घालणार पोलीस?

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती कमी बोलतात. तसे कोणताही सनदी अधिकारी हा कमीच बोलणारा असतो. परंतु आयुक्त भारती गरज असेल तरच बोलणार या पठडीतले आहेत. गेली काही वर्षे खंड पडलेली मुंबई पोलिसांची गुन्हे परिषद त्यांनी सुरु करून एक...

वरळीच्या मेट्रो स्थानकाच्या उरलेल्या कामासाठी पुन्हा घाई?

अवघ्या पाच दिवसात किंवा केवळ ६५ दिवसांत भुयारी रेल्वेचे मुंबईतले वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानक सुरु केल्याचा अभिमान मुंबई मेट्रो यंत्रणा मानत असले तरी असल्या अभिमानाला अर्थ नाही हे यंत्रणा आणि मुंबईकरही जाणून आहे! काल-परवा दोन दिवस या...
Skip to content