Homeपब्लिक फिगरएकीकडे दुष्काळ तर...

एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

राज्यात दुष्काळाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही. पाण्याचा विषय खूपच गंभीर झाला आहे. माझ्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत. दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सिरयस नाही. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी पाऊस.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने काल खासदार सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताच्या ज्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे, असे सुळे म्हणाल्या.

अभिनेता सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करावा लागेल. सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भररस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भररस्त्यावर  अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावरील टीका ६० वर्षं सुरू आहे. शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे दररोज शरद पवारांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेले ६० वर्षे मार्केटमध्ये खणखणीत वाजत आहे. त्यांना काहीही करून शरद पवारांना संपवायचं आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content