Homeपब्लिक फिगरएकीकडे दुष्काळ तर...

एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

राज्यात दुष्काळाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही. पाण्याचा विषय खूपच गंभीर झाला आहे. माझ्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत. दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सिरयस नाही. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी पाऊस.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने काल खासदार सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताच्या ज्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे, असे सुळे म्हणाल्या.

अभिनेता सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करावा लागेल. सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भररस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भररस्त्यावर  अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावरील टीका ६० वर्षं सुरू आहे. शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे दररोज शरद पवारांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेले ६० वर्षे मार्केटमध्ये खणखणीत वाजत आहे. त्यांना काहीही करून शरद पवारांना संपवायचं आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content