Homeपब्लिक फिगरडॉ. दीपक सावंत...

डॉ. दीपक सावंत यांच्यावर लीलावतीत अँजिओप्लास्टी

डंम्परच्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेले राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हृदयालाही या अपघातात जबर धक्का बसल्याचे स्पष्ट झाले असून आज त्यांच्यावर लीलावती रूग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. ज्येष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॅा. मॅथ्यूज यांनी त्यांच्यावर ही अँजिओप्लास्टी केली.

काल डॉ. सावंत यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी, २० जानेवारी रोजी सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना काशिमीरा येथे महामार्गावर त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती.

आपण या अपघाताच्या गुंतागुंतीच्या आजारातून बाहेर पडून पुन्हा एकदा पालघर, मेळघाट व इतरत्र असलेले कुपोषण, बालमृत्यू, आश्रमशाळा यावर पुन्हा लवकरच काम सुरू करू. इतकेच नव्हे तर डम्पर तसेच हेवी व्हेहीकल व रॅश ड्रायव्हींगमुळे निष्पाप नागरिकांना कायमचे अंपगत्व येते, यासाठीसुद्धा आपण काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी आता व्यक्त केला आहे.

ॲम्ब्युलन्ससाठी डेडिकेटेड लेन व ग्रीन कॉरीडर असावा, डंपर व अवजड वाहनांना गव्हर्नर स्पीड लावण्याची सक्ती करावी यासह अनेक सूचना डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही केल्या आहेत. अवजड वाहने आणि डंपर ट्राफिकचे नियम पाळत नाहीत. हायवेची परिस्थिती ट्राफिकमुळे इतकी वाईट आहे की, दहिसर चेकनाका व कासा येथून येणारे २-३ रूग्ण आठवड्यात दगावतात ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला अपघात झाल्यावर वर्सोव्यावरून पोलीस ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागला. आपली ही स्थिती तर सामान्यांचे काय? असा सवाल त्यांनी केला.

मेट्रोच्या कामामुळे जनता त्रस्त आहे. रस्ते उखडले आहेत. मुंबईतील पश्चिम व पूर्व उपनगरामधील बेफाम कन्स्ट्रक्शन रोखा, मुंबईतील डंपर पहाटे २.३०पासून बेफाम रस्ता कापतात, सर्वसामान्यांचा जीव, पार्किं केलेल्या गाडया तुडवतात, याकडे जातीने लक्ष देण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत, अशा सूचनाही डॉ. सावंत यांनी केल्या आहेत.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content