Homeकल्चर +चर्चा करा महाराष्ट्राच्या...

चर्चा करा महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर, येत्या रविवारी!

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (१८९८ – २०२३) सांगतेनिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळाने येत्या ३० जुलैला एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र शारदा मंगल कार्यालय, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

चर्चासत्राचा विषय ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ हा असून उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि प्रमुख वक्त्या इतिहास अभ्यासक डॉ. प्राची देशपांडे आहेत. त्या ‘महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान : आंतरसंबंध’ या विषयावर आपले विचार मांडतील. महाराष्ट्रातील शेती, पर्यावरण, शिक्षण, उद्योग, रोजगार, प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था, भाषाधोरण या विषयांवर त्या-त्या क्षेत्रातले अभ्यासक आपले सखोल विचार यावेळी मांडणार आहेत.

‘शेती आणि पर्यावरण’, या विषयावरील पहिल्या सत्रात सोमिनाथ घोळवे आणि परिणिता दांडेकर भूमिका मांडतील. या सत्रात डॉ. जास्वंदी वांबूरकर आणि साईली पलांडे-दातार या  चर्चक असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. शरद जावडेकर महाराष्ट्राच्या शिक्षणावर, तर डॉ. नीरज हातेकर उद्योग आणि रोजगारावर आपले विचार मांडतील. या सत्राचे चर्चक अनुक्रमे डॉ. अवनीश पाटील आणि डॉ. नारायण भोसले असतील. तिसऱ्या सत्रात ‘प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर, तर ‘महाराष्ट्राचे भाषा धोरण’ या विषयावर डॉ. प्रकाश परब आपली मते मांडतील. डॉ. श्रद्धा कुंभोजकर व डॉ. नितीन रिंढे या सत्राचे चर्चक  असतील.

हे चर्चासत्र निःशुल्क असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी यांनी या अभ्यासपूर्ण चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक रवींद्र गावडे (प्रमुख कार्यवाह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय), डॉ. जयसिंगराव पवार (अध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळ), डॉ. दीपक पवार (संचालक, इतिहास संशोधन मंडळ) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२०४३७६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content