Homeपब्लिक फिगर‘मी पुन्हा येईन..'च्या...

‘मी पुन्हा येईन..’च्या स्वप्नाला अजून २५ वर्षं?

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्षं लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. गेली २२ वर्षं माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. पण, फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवतानाच सांगितले आहे की, हे सरकार पाचच नाही तर २५ वर्षं टिकणार आहे आणि तेच घडणार असेही ते म्हणाले.

लोकांना मूर्ख बनवण्याचे मोदींचे काम

मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम ते करत असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधाराचे पक्षकार होते.  तेव्हाही आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते. ते कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची त्यांची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले, ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्य सरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही. पण एकमत निर्माण करणे, लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही, असेही मलिक म्हणाले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content