Homeबॅक पेजमुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून होणार धन कुबेर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धन कुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साधुसंत, मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत आजपासून होत आहे. आज 11 मार्च ते 13 मार्च 2024 रोजी असे तीन दिवस हा भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.

पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून पहिल्यांदाच धन कुबेर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे श्री. अंबामाता, श्री महादेव, श्रीकृष्ण, राममंदिर, श्री विठ्ठल, श्री परशुराम, श्री लक्ष्मी नारायण, श्री महालक्ष्मी, श्री संतोषी यांची मंदिरे आहेत. याच परिसरात श्री धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दि. 11 व 12 मार्चला मूर्तीपूजन भजन उत्सव आयोजित करण्यात आला असून आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, हवालदार दुबे, ओमप्रकाश शर्मा (अध्यक्ष परशुराम सेना), प्रतीक (गुड्डू) राय, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी यांच्याकडे नियोजन असणार आहे. दि. 13 मार्च रोजी प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजल्यानंतर मूर्ती अभिषेक करता येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती मंच, सनातन संस्था, मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम सेना, ब्राह्मण महासंघ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content