Homeबॅक पेजमुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून होणार धन कुबेर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धन कुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साधुसंत, मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत आजपासून होत आहे. आज 11 मार्च ते 13 मार्च 2024 रोजी असे तीन दिवस हा भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.

पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून पहिल्यांदाच धन कुबेर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे श्री. अंबामाता, श्री महादेव, श्रीकृष्ण, राममंदिर, श्री विठ्ठल, श्री परशुराम, श्री लक्ष्मी नारायण, श्री महालक्ष्मी, श्री संतोषी यांची मंदिरे आहेत. याच परिसरात श्री धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दि. 11 व 12 मार्चला मूर्तीपूजन भजन उत्सव आयोजित करण्यात आला असून आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, हवालदार दुबे, ओमप्रकाश शर्मा (अध्यक्ष परशुराम सेना), प्रतीक (गुड्डू) राय, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी यांच्याकडे नियोजन असणार आहे. दि. 13 मार्च रोजी प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजल्यानंतर मूर्ती अभिषेक करता येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती मंच, सनातन संस्था, मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम सेना, ब्राह्मण महासंघ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content