Homeपब्लिक फिगरज्यांना जत्रेचा अनुभव...

ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना यात्रा काय समजणार?

ज्यांना फक्त जत्रेचाच अनुभव आहे त्यांना यात्रा काय समजणार? प्रत्येकाचे आपले आपले आकलन असते, आपला आपला समज असतो. त्यांना काय सांगणार? एक मात्र खरे की, या चारही जन आशिर्वाद यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्यातले हे सरकार मात्र हादरून गेले आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

टी.व्हीजे.ए. आणि मी मुंबईकर अभियानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे उद्घाटन केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. मंत्रालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आता तरी त्यांचा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे, असेही ते म्हणाले.

शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आतातरी हा प्रयत्न सरकार करेल, अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कोरोना काळात ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवा दिली. यात ६० हजारांहून जास्त डॉक्टर तसेच पॅरामेडिकल स्टाफ सहभागी जाला. टेलि-कन्सल्टेशनच्या माध्यमातून ९० लाखांहून जास्त लोकांना लाभ झाला. दररोज सरासरी ७० हजारांना फायदा झाला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत २ कोटी नागरिक आतापर्यंत लाभान्वित झाले. २५ हजार कोटींचे उपचार करण्यात आले. २३ हजार संलग्न रूगणालयांमधून ही सेवा देण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २३.६६ कोटी लोकांना मदत करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे १०.५३ तर अटल पेन्शन योजनेद्वारे ३.१३ कोटी लोकांना मदत झाली, असेही फडणवीस म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content