Homeचिट चॅटबाळशास्त्री जांभेकरांबरोबरच बाबुराव...

बाळशास्त्री जांभेकरांबरोबरच बाबुराव पराडकरांचेही स्मारक उभारा!

६ जानेवारी १८३२ रोजी ज्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण, हे वर्तमानपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जन्मगावी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे राष्ट्रीय स्मारक बनवावे तसेच हिंदी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रो‌वणाऱ्या बाबुराव पराडकर यांच्या कोकणात असलेल्या पराड गावातही त्यांच्या नांवे राष्ट्रीय स्मारक बनवावे, या मागणीचा पुनरुच्चार ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी केला.

पत्रकार उत्कर्ष समिती, मुंबईतर्फे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी, शिबानी जोशी, सरफराज आरझू यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात त्रिवेदी यांनी सांगितले की, इच्छाशक्ती असली की काम कसे पूर्ण होते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी, या स्मारकाची उभारणी करुन दाखवून दिले आहे.

गुजरातमधील डभोईजवळचे केवडिया हे गाव २०१४पर्यंत कुणालाही माहित नव्हते. पण २०१८मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे उभारण्यात आले आणि आज हेच केवडिया जागतिक नकाशावर आले आहे. लाखो पर्यटक येतात आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जर केवडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक होऊ शकते मग आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ला का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.

पत्रकार उत्कर्ष समितीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन आम्हाला आणखी ऊर्जा प्राप्त करून दिली आहे. कामाठीपुरासारख्या समाजामधील उपेक्षित आणि विशिष्ट नजरेतील परिसरात राजेंद्र लकेश्रीसारखा हिरा गेल्या पस्तीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे. बॅ. रामराव आदिक यांच्याकडे बत्तीस वर्षे सेवा करुनही काहीही पदरात पाडून घेण्याऐवजी समाजाला सतत देत राहण्याची त्यांची भूमिका आदर्श निर्माण करणारी आहे, अशा शब्दांत सर्वच पत्रकारांनी त्यांचा गौरव केला.

पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोकराव म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांना अपघात विमा देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री, सरचिटणीस आनंद मुसळे,  सुनील कोलगे, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईच्या महिला अध्यक्षा डॉ. संपदा कारेकर, माजी नगरसेवक जावेद जुनेजा, राजेंद्र नरवणकर, बबन गवस, शाकीर अन्सारी, सुरेश काळे, सुनील कदम, सुरेश शेट्टी, सुरेंद्र तेलंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूर्य लाड हिंदु खाटिक समाज, 8 वी गल्ली, मार्केटसमोर, मानाजी राजूजी मार्ग, कामाठीपुरा, मुंबई- ८ येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र या संस्थेच्या २०२३च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी ज्येष्ठ संसदपटू, पत्रकार भाई डॉ. केशवराव धोंडगे आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content