Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आरोग्याचं महत्त्व...

मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगणारी परिषद उद्यापासून पुण्यात!

मानसिक आरोग्याचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असलेले महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा समतोल राखणे किती आवश्यक आहे हे कोरोना महामारीच्या काळात अधोरेखित झालं आहे. या संपूर्ण विषयावर अधिक जनजागृती करण्याच्या उद्देशानं ए. पी. जे. ग्लोबलने पुण्यात उद्यापासून ‘स्वास्थ्यम्’, या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे.

 मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याच्या हेतूनं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा केंद्र, पुण्याचे जे. डब्ल्यू. मॅरिएट आणि डीपी रस्त्यावरील पंडित फार्मस् अशा तीन ठिकाणी ही तीन दिवसांची परिषद होत आहे. योग, फिटनेस, मानसिक आरोग्य जपणुकीसाठी संगीताचे महत्त्व अशा विविध विषयांवर या परिषदेत मार्गदर्शन केलं जाणार आहे. ९ ते ११ डिसेंबर, २०२२ या काळात ही परिषद होणार आहे.

‘स्वास्थ्यम्’च्या व्यासपीठावर आरोग्य आणि स्वास्थ्य या क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांकडून त्यांच्या सत्रांना उपस्थित राहणाऱ्यांना परस्पर संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे.

डॉ. कुमार विश्वास, डॉ. हंसराज योगेंद्र, सर्वेश शसी, डॉ. राजेंद्र बर्वे, योगी श्री एम, ‘इस्कॉन’चे गौरांग दास, प्रख्यात अभिनेत्री आणि हेल्थ आयकॉन शिल्पा शेट्टी, उस्ताद रशिद खाँ आणि रुहानी सिस्टर्स हे संगीत क्षेत्रातले मान्यवर, मार्शल आर्टमधले तज्ज्ञ चिता यज्नेश शेट्टी, आवाजाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्या प्रियांका पटेल, आहारतज्ज्ञ नुपूर पाटील स्वास्थ्यम् परिषदेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनिलिआ देशमुख हेदेखील परिषदेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहून या आगळ्या उपक्रमाला आपला पाठिंबा देणार आहेत.

मानसिक आणि शारिरिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यांचा परस्पर संबंध याबाबत जागृती व्हावी यासाठी हा जागतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात तरुणाई आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात भरीव कार्य करणारेही या शहरात वास्तव्यास आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत विविध वयोगटांशी चर्चा करुन जागृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः देशाचे भविष्य असलेल्या तरुण वर्गात याबाबत जागृती होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर व्हावा, हा ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content