Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आरोग्याचं महत्त्व...

मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगणारी परिषद उद्यापासून पुण्यात!

मानसिक आरोग्याचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असलेले महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा समतोल राखणे किती आवश्यक आहे हे कोरोना महामारीच्या काळात अधोरेखित झालं आहे. या संपूर्ण विषयावर अधिक जनजागृती करण्याच्या उद्देशानं ए. पी. जे. ग्लोबलने पुण्यात उद्यापासून ‘स्वास्थ्यम्’, या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे.

 मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याच्या हेतूनं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा केंद्र, पुण्याचे जे. डब्ल्यू. मॅरिएट आणि डीपी रस्त्यावरील पंडित फार्मस् अशा तीन ठिकाणी ही तीन दिवसांची परिषद होत आहे. योग, फिटनेस, मानसिक आरोग्य जपणुकीसाठी संगीताचे महत्त्व अशा विविध विषयांवर या परिषदेत मार्गदर्शन केलं जाणार आहे. ९ ते ११ डिसेंबर, २०२२ या काळात ही परिषद होणार आहे.

‘स्वास्थ्यम्’च्या व्यासपीठावर आरोग्य आणि स्वास्थ्य या क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांकडून त्यांच्या सत्रांना उपस्थित राहणाऱ्यांना परस्पर संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे.

डॉ. कुमार विश्वास, डॉ. हंसराज योगेंद्र, सर्वेश शसी, डॉ. राजेंद्र बर्वे, योगी श्री एम, ‘इस्कॉन’चे गौरांग दास, प्रख्यात अभिनेत्री आणि हेल्थ आयकॉन शिल्पा शेट्टी, उस्ताद रशिद खाँ आणि रुहानी सिस्टर्स हे संगीत क्षेत्रातले मान्यवर, मार्शल आर्टमधले तज्ज्ञ चिता यज्नेश शेट्टी, आवाजाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्या प्रियांका पटेल, आहारतज्ज्ञ नुपूर पाटील स्वास्थ्यम् परिषदेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनिलिआ देशमुख हेदेखील परिषदेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहून या आगळ्या उपक्रमाला आपला पाठिंबा देणार आहेत.

मानसिक आणि शारिरिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यांचा परस्पर संबंध याबाबत जागृती व्हावी यासाठी हा जागतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात तरुणाई आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात भरीव कार्य करणारेही या शहरात वास्तव्यास आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत विविध वयोगटांशी चर्चा करुन जागृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः देशाचे भविष्य असलेल्या तरुण वर्गात याबाबत जागृती होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर व्हावा, हा ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content