Homeपब्लिक फिगरशरद पवारांचे निकटचे...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता’ ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे काल सायंकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी मेघे, पुत्र माजी आमदार सागर मेघे, आमदार समीर मेघे, मुली स्मिता मेघे धारकर आणि संगीता मेघे ग्रोवर व सून देविका आणि वृंदा, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज पवनार येथे शासकीय इतमामाने होणार आहे.

आज दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी, पांडे लेआऊट खामला, नागपूर येथील निवासस्थानी राहणार आहे. दुपारी १ वाजता त्यांचे पार्थिव सावंगी मेघे येथे नेण्यात येईल. ०२.३० ते ०४.०० वाजेपर्यंत पार्थिव सावंगी (मेघे), वर्धा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. ०४.०० वा. त्यांची अंत्ययात्रा पवनार येथील त्यांच्या शेताकडे रवाना होईल आणि तेथे त्यांचे शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, आ. चरण ठाकूर, नाना पटोले, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती तसेच सामान्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने एक दूरदर्शी आणि जनतेसाठी झटणारा नेता हरपला आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

दत्ता मेघे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने केली होती. लहानपणापासूनच समाजकार्याची ओढ असल्याने त्यांनी आपल्या युवा अवस्थेतच युवक कॅडर नावाची संस्था स्थापन करून विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे सुरु केले आणि विविध जनआंदोलनाचे सक्रिय नेतृत्त्व केले. शिक्षणासोबतच त्यांचे सामाजिक कार्य सुरु राहिले. बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एल.आई.सी.मध्ये डेव्हलपमेन्ट ऑफिसर म्हणून नोकरी सुरु केली. दरम्यान त्याच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीकडे बघता शरद पवार यांनी त्यांच्या नेतृत्त्वाचा गुण हेरून त्यांना दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतानाही आपल्या मंत्रिमंडळात १९७८मध्ये सरळ मंत्री म्हणून स्थान दिले. त्यानंतर मेघे तब्बल चार वेळा राज्यात मंत्री म्हणून राहिले. विधान परिषदेमध्येसुद्धा त्यांनी एकदा विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.

१९९१ मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतरची निवडणूक त्यांनी रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढवली व ते निवडून आले. त्यांच्या राजकीय करकीर्दीत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. विदर्भात तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देत नागपूर, वर्धा तसेच संपूर्ण विदर्भात शाळा-महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. कुठलीही बाहेरील आर्थिक मदत न घेता त्यांनी अनेक सार्वजनिक उपक्रम राबवले. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केले. विदर्भात त्यांनी सहकारी बँक आणि सूतगिरण्या सुरु केल्या.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content