Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताच्या विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने

पाहत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल  1 ट्रिलियन डॉलरकडे नेण्याच्या दृष्टीने दावोसमधली ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवाना होण्यापूर्वी सांगितले.

महाराष्ट्राने गेल्या वर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्यशासनाने ठेवले आहे. दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Continue reading

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...

भाग घ्या हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेत

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 'डिस्कवर, परफॉर्म, राइज इन खयाल', या थीमखाली हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकारांसाठी असून, येत्या २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृह,...

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी...
Skip to content