Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना राज्य...

चेंबूर जिमखाना राज्य कॅरम स्पर्धा शनिवारपासून 

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शनिवारी, २० जुलैला सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे तर महिला गटांच्या सामन्यांना २१ जुलैला प्रारंभ होईल.

पुरुष एकेरी गटात ३२० तर महिला एकेरी गटात ५० खेळाडूंनी भाग घेतला असून पुरुष एकेरी गटातील विजेत्याला रोख रुपये २५ हजार तर महिला एकेरी गटातील विजेतीला रोख रुपये ८ हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या सामन्यांचे तसेच उपउपांत्य फेरीपासूनच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. चालू वर्षी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आपले ७०वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या मोसमातील ही चौथी स्पर्धा आहे.

पुरुष एकेरी गटात ५८ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या मोहम्मद घुफ्रानला प्रथम मानांकन देण्यात आले आहे, तर ४३ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या विकास धारियाने द्वितीय मानांकन प्राप्त केले आहे. महिलांमध्ये ७१ गुणांनिशी आघाडीवर असणाऱ्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले असून ५८ गुण प्राप्त करणाऱ्या ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने द्वितीय मानांकनाचा मान मिळविला आहे.

स्पर्धेतील मानांकन असे..

पुरुष एकेरी: १) महम्मद घुफ्रान (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) अभिजित त्रिपणकर (पुणे), ४) प्रशांत मोरे (मुंबई), ५) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ६) झैद फारुकी (ठाणे), ७) रहिम खान (पुणे), ८) पंकज पवार (मुंबई).

महिला एकेरी: १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ६) श्रुती सोनावणे (पालघर), ७) उर्मिला शेंडगे (मुंबई), ८) आएशा खान (मुंबई)

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content