न्यूज ॲट अ ग्लांस

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले अधिकार सहानुभूती, संवेदनशीलता आणि लोकसेवेच्या भावनेने वापरावेत, असे आवाहन केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि शासकीय निवासस्थाने सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. मर्यादित शासकीय निवासस्थानांच्या उपलब्धतेमुळे अधिकाऱ्यांना अनेकदा लांबचा प्रवास करावा लागतो. मुंबई आणि नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये सध्या भाड्याच्या इमारतींमधून कार्यरत...

मतदारांच्या तक्रार निवारणासाठी...

निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठीकेंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच "1950" हेल्पलाईन क्रमांकासह देशभरामध्‍ये जिल्हास्तरावर ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली आहे. याबाबतची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे- नागरिकांच्या सर्व...

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान...

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या...

‘महादेवा’त सहभागी व्हा...

'महादेवा'त सहभागी व्हा आणि मेस्सीबरोबर फुटबॉल खेळा! हो.. १३ वर्षांखालील मुला-मुलींकरीता ही संधी आहे. महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन...

पाकिस्तानात ‘चिकनपेक्षा टोमॅटो...

पाकिस्तान सध्या अभूतपूर्व महागाईच्या संकटाचा सामना करत असून, दैनंदिन वापरातील भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. विशेषतः टोमॅटोच्या किमतीने सर्व विक्रम मोडीत काढत लाहोर, कराची...

राज्यसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये...

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) तीन जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण...

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी...

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते...

दिवाळीत प्रियजनांना भेट...

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर...

महाराष्ट्रात कोरडे हवामान...

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून...
Skip to content