सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी बेरोजगार आणि अहोरात्र सोशल मीडियावर पडललेल्या तरूणांना झुरळ, म्हणून संबोधल्यावर अमेरिकेत बोस्टनमधे शिकत असलेल्या अभिजीत दीपकेने कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा केली. इंस्टाग्रामवर अभिजीतच्या घोषणेला देशातून तरूणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अडिच कोटी फॉलोअर्स भेटले. नीट परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी अभिजीतने केली. बावीस लाख विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रचंड मानसिक त्रास झाला, नैराश्यातून २४ मुलांनी आत्महत्त्या केल्या, गेल्या दहा वर्षांत १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या. त्याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. कोणतेही संघटन नसलेली...
राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या काचपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना, नितेश राणे यांना...
एप्रिल महिन्याच्या मध्यास इथेच आम्ही 'काही सेकंदात' दुसरी लोकल गाडी धावणार, या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली हॊती. तीच गत सध्या मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी...
ज्या बातम्या आणि शीर्षके जून अखेरीकडे वा खरेतर जुलैच्या मध्यावर अपेक्षित असतात, ती यंदा बरीच आधी झळकू लागली. “मुंबईत संततधार, पुण्यात पावसामुळे वाहतूककोंडी, पावसाने...
अवघ्या पाच दिवसात किंवा केवळ ६५ दिवसांत भुयारी रेल्वेचे मुंबईतले वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानक सुरु केल्याचा अभिमान मुंबई मेट्रो यंत्रणा मानत असले...
गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोचे वरळी स्थानक वाहून गेल्याचे प्रमुख कारण आहे भेसळयुक्त सिमेंटचे काम! पावसाचे वा गटाराचे पाणी स्थानकात शिरू...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा काही निवडक आमदारांना, राजकीय नेत्याने यशस्वी कसे व्हावे याचे एक गुपित सांगितले. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात वैधानिक समित्यांच्या एकत्रित उद्घाटन...
रविवारी झालेल्या एका पत्रकार संमेलनात न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी राज्याची भाषा आणि वाणी बदललेली असल्याबाबत जाहीर खंत व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (काका)...