Homeचिट चॅट४०० पारसाठी महाराष्ट्रात...

४०० पारसाठी महाराष्ट्रात भाजपाचे बूथ विजय अभियान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी भाजपाने कालपासून राज्यभर सहा दिवसांचे ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य समीर गुरव यांनी याबाबतची माहिती दिली.

या अभियानाचे स्वरूप याप्रमाणे-

समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य.

घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे.

प्रत्येक घर आणि वाहनावर स्टीकर.

लाभार्थींशी नियमित संपर्क.

प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा.

समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठका.

भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न.

बूथपासून दूरवर राहाणाऱ्या मतदारांना मतदानाचे आवाहन.

Continue reading

काही राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम

देशातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एका बाजूला चक्रीय चक्रवातामुळे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात 'अँटी-सायक्लोनिक' स्थितीमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या...

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...
Skip to content