Homeमुंबई स्पेशलभाई जगतापांना नारळ!...

भाई जगतापांना नारळ! वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा!!

लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांच्या जागी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी आज याबाबतचे पत्र जारी केले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या प्रा. वर्षा गायकवाड चार वेळा राज्य विधानसभेवर निवडून आल्या आहेत. मुंबईतल्या धारावी मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. 2019 ते 2022 म्हणजेच मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. 2004पासून सतत चार वेळा त्या निवडून आल्या आहेत. साधारण पाच वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. गणितात एम.एस्सी. झालेल्या प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी बीएडसुद्धा केले आहे.

सध्या अशोक उर्फ भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला फार काही साध्य करता येणार नाही, या निर्णयापर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आल्यानंतर भाई जगताप यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसेच एकदा ते विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत. सध्या ते राज्य विधान परिषदेवर कार्यरत आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांनी सार्वजनिक जीवनात बराच काळ गाजवला. आजही काँग्रेसप्रणित काही कामगार संघटनांचे ते प्रतिनिधित्व करतात.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content