Homeमुंबई स्पेशलभाई जगतापांना नारळ!...

भाई जगतापांना नारळ! वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा!!

लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांच्या जागी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी आज याबाबतचे पत्र जारी केले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या प्रा. वर्षा गायकवाड चार वेळा राज्य विधानसभेवर निवडून आल्या आहेत. मुंबईतल्या धारावी मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. 2019 ते 2022 म्हणजेच मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. 2004पासून सतत चार वेळा त्या निवडून आल्या आहेत. साधारण पाच वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. गणितात एम.एस्सी. झालेल्या प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी बीएडसुद्धा केले आहे.

सध्या अशोक उर्फ भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला फार काही साध्य करता येणार नाही, या निर्णयापर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आल्यानंतर भाई जगताप यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसेच एकदा ते विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत. सध्या ते राज्य विधान परिषदेवर कार्यरत आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांनी सार्वजनिक जीवनात बराच काळ गाजवला. आजही काँग्रेसप्रणित काही कामगार संघटनांचे ते प्रतिनिधित्व करतात.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content