Homeकल्चर +सावधान! अभिनय अंधःकारात...

सावधान! अभिनय अंधःकारात टाळ्या शोधत असतो!!

“अभिनय शिकविला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्‍या लोकांना वाचायला शिका. जीवनात आलेले अनुभव व्यक्तीला उत्कृष्ट अभिनय शिकवू शकतो. परंतू अभिनय हा सतत अंध:कारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा”, असे विचार प्रसिद्ध अभिनेता पद्मश्री नाना पाटेकर यांनी नुकतेच व्यक्त केले.

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’चे उद्घाटन अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, संजय कामटेकर, प्रकुलगुरू डॉ. तपन पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, प्रसिद्ध क्रिएटीव्ह डायरेक्टर अभिजित पानसे, धिरज सिंग व दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कलाकार होणे म्हणजे आयुष्यभर दु:खी राहणारा. कारण, रोजच्या अभिनयात सुख व दु:ख उधार घ्यावे लागते. यामध्ये आपण स्वतःबरोबरच कुटुंबालाही विसरत जातो. पुढे सर्व गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा हातातून सर्व काही निसटलेले असते. रोजच्या जीवनात सुख-दु:खाची व्याख्या बदलली तरच सुखी रहाल. कठिण परिश्रमाच्या आजूबाजूला यश असते. जीवनात काहीच कठिण नाही. त्यासाठी फक्त विचार सकारात्मक ठेवा, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.

अभिजित पानसे म्हणाले की, संघर्षाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. भारतीय चित्रपटांवर आजही हॉलिवूडचा खूप मोठा प्रभाव दिसतो. बॉलिवूडवर पडलेली विदेशी छाप पुसावयाची आहे. त्यासाठी योग्य फिल्म स्कूलची आवश्यकता आज पूर्ण झाली आहे. येथील प्रॅक्टिकल मातृभाषेत असणार आहे. तसेच १० टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देऊन मोफत शिक्षण दिले जाईल. येथे प्रथम सेमिस्टरपासून विद्यार्थ्यांना प्रोफेशनल स्टेजवर शिकायला मिळणार आहे.

डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले की, सध्याच्या काळात फिल्म इंडस्ट्रीत खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे यात टिकण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसविण्यासाठी कौशल्य, समर्पण, कठिण परिश्रम, पेशन्स आणि स्वतःचे काही तत्त्व असणे गरजेचे आहे, ज्याआधारे तुम्ही प्रगती करू शकाल.

धिरज सिंग यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. याप्रसंगी एनएसडीचे प्रमुख पद्मश्री वामन केंद्रे यांनी स्कूलला शुभेच्छा दिल्या. तसेच नाना पाटेकर यांनी वेबसाईट लॉन्च केली. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.

Continue reading

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक...

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...
Skip to content