Homeमुंबई स्पेशलअश्विनी भिडे झाल्या...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी ‘मेट्रो वुमन’ म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे. पुढील आदेश येईपर्यंत भिडे या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.

भिडे यांच्या नियुक्तीपूर्वी असीम गुप्ता, अनिल डिगीकर, मिलिंद म्हैसकर आणि संजय मुखर्जी यांच्या नावांचीही या पदासाठी चर्चा होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असीम गुप्ता यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेर भिडे यांची निवड झाली. फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिडे यांनी याआधी मुख्यमंत्री कार्यालयातही सचिव म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अलीकडच्या काळात, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस

महासंचालक ठरल्या, सुजाता सौनिक यांनी पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून इतिहास रचला आणि आता भिडे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होऊन या परंपरेत आणखी एका सोनेरी पानाची भर घातली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ अंतर्गत झाली. त्यानंतरच्या १३८ वर्षांत प्रथमच एका महिलेने या महापालिकेच्या सर्वोच्च प्रशासकीयपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. अश्विनी भिडे यांची ही नियुक्ती केवळ मुंबईच्याच नव्हे, तर देशाच्या प्रशासकीय इतिहासातील एक सुवर्णअध्याय ठरला आहे.

आव्हाने मोठी, अनुभवही दांडगा

अश्विनी भिडे ज्यावेळी पदभार स्वीकारत आहेत, त्यावेळी बीएमसीसमोर आव्हानांचा डोंगर आहे. नुकताच ₹ ८०,९५२ कोटींचा महाकाय अर्थसंकल्प सादर झाला आहे. मुंबईचा किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. मेट्रोचे अनेक टप्पे एकाच वेळी सुरू आहेत. त्याशिवाय स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन अशा मूलभूत नागरी सेवांची सातत्याने वाढत चाललेल्या लोकसंख्येला पुरवठा करणे, हे सारे प्रश्न त्यांच्या मेजावर येऊन पडतील. सरकारच्या निवडणूक वचनांची पूर्तता करतानाच वित्तीय शिस्त राखणे हेही त्यांच्यासाठी कसोटीचे ठरणार आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content