Homeकल्चर +अडीच दशकांनंतर अरुण...

अडीच दशकांनंतर अरुण कदम पुन्हा रंगभूमीवर!

हास्य अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम कलाकार अरुण कदम जवळपास अडीच दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर सक्रीय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून आनंदांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

भद्रकाली प्रॉड्कशन आणि प्रसाद कांबळी निर्मिती `वस्त्रहरण’ या नाटकातून ते पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले असून या नाटकाचे पहिली तीन प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राची लोकधारा, या कार्यक्रमाने त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना आपली ओळख करून दिली.

त्यानंतर नटरंग या नाटकाने त्यांना सरी ग सरी, अशी बायको हवी, एकदा पाहवं करून, भटाच्या साक्षीने, पैसाच पैसा, भ्रमाचा भोपळा, बापाचा बाप, प्रतिक्रिया अशी नाटके मिळवून दिली.

काफिला हा त्यांचा हिंदी चित्रपटदेखील गाजला आहे. जुगाड, येरे येरे पैसा, लोणावळा बायपास, हृदयनाथ, घंटा, बाहुलीचे लगीन, धावाधाव, जनता जनार्दन अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. हत्यार, चलो दिल्ली, थँक्स माँ अशा काही हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ते घराघरात पोहोचले आहेत. देश-विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आता ते पुन्हा एकदा रंगमंचावर रसिकांना हसवण्यासाठी येत आहेत. 

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content