Homeकल्चर +अरुण जोशी यांना...

अरुण जोशी यांना स्वा. सावरकर गौरव पुरस्कार प्रदान

मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, तर प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. वि. स. जोग, तसेच समितीचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, मिलिंद कानडे, महासचिव अनिल देव व्यासपीठावर उपस्थित होते.

हेमंत धर्माधिकारी यांनी गीत सादर केले. प्रास्ताविक अनिल देव, पाहुण्यांचा परिचय डॉ. अजय कुळकर्णी यांनी करून दिला. डॉ. संजय दुधे व डॉ. वि. स. जोग यांच्या हस्ते अरुण जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, 11 हजार रोख व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन श्याम देशपांडे यांनी केले. आरती जोशींचा सत्कार संध्या लाखे यांच्या हस्ते साडीचोळी देऊन करण्यात आला. सावरकर विचार मंचतर्फे वीरेंद्र देशपांडे, हिंदू महासभेतर्फे पद्मश्री तांबेकर, सावरकर विद्या भवनतर्फे कल्पना जोग तसेच शांतीनिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, अरुण जोशी शिक्षण महाविद्यालयातर्फेही सत्कार करण्यात आला.

डॉ. संजय दुधे म्हणाले की, सावरकरांनी भाषाशुद्धी व लिपीशुद्धीसाठी चळवळ केली. देशाला आज सावरकरांच्या विचारांची गरज आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर देशभक्त, थोर क्रांतिकारक होते, तर डॉ. वि. स. जोग म्हणाले की सावरकर जातपात न मानणारे होते. तरीही त्यांना जातीयवादी ठरवले जाते. सावरकरांना सापत्नभाव का, असा सवालही डॉ. जोग यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आज सावरकरांना भारतरत्न जाहीर व्हायला हवे होते. इतरांना दिले त्याचे समाधान आहेच. मात्र, सावरकरांना न दिल्याने विषाद वाटतो. यापुढे मी व समितीलाही सावरकरांना भारतरत्न द्या, अशी भिक्षा मागू देणार नाही.

अरुण जोशी यांनी, हा सन्मान म्हणजे सावरकर विचारांना अधिकाधिक देशभक्तांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न असून यापुढील काळातदेखील हे कार्य अविरतपणे सुरुच राहिल, असे सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले. चंद्रकांत लाखे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. शुभा साठे, आभार प्रदर्शन अजय आचार्य यांनी केले. अनिल देव यांनी गायिलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content