Homeपब्लिक फिगरचेंबूरच्या आंबेडकर उद्यानात...

चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात लवकरच तेवत राहणार अखंड भीमज्योत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत मुंबईत चेंबूरच्या भारतरत्न डॉ. आंबेडकर उद्यानात लवकरच उभारली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येणार असून ही भीमज्योत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देत राहील.

चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महामानवाची जयंती साजरी केली जाते. राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. याठिकाणी भीमज्योत उभारावी, अशी मागणी काही महिन्यांपासून केली जात होती. खासदार शेवाळे यांनी याबाबत पाठपुरावा करून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करून घेतल्या होत्या. आता लवकरच चेंबूरमध्ये ही अखंड भीमज्योत उभारली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या आंबेडकर जयंतीला या उद्यानात बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत हे नवे आकर्षण असणार आहे.

अशोक स्तंभ आणि भीमज्योत

चेंबूरचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आंबेडकरी अनुयायांसाठी आस्थेचे ठिकाण आहे. याठिकाणी आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार गेल्या वर्षी शेवाळे यांच्या पाठपुराव्याने अशोक स्तंभ उभारण्यात आला. आता लवकरच इथे भीमज्योतदेखील उभारली जाणार आहे.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content