Homeकल्चर +व्यक्तीचाही बरावाईट प्रभाव...

व्यक्तीचाही बरावाईट प्रभाव वास्तूवर!

ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. साधना करणार्‍या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक राज कर्वे यांनी केले.

त्रिपुरातल्या आगरतळा येथे नुकतेच झालेल्या ‘नॅशनल सेमिनार ऑन कन्ट्रिब्यूशन ऑफ वास्तूशास्त्र इन मॉडर्न कन्टेक्स्ट’ या परिषदेत कर्वे बोलत होते. त्यांनी ‘वास्तूशास्त्रानुसार वास्तू-निर्मिती करण्याचे लाभ, तसेच वास्तूदोषांच्या निवारणासाठी सुलभ आध्यात्मिक उपायांच्या जोडीला साधना करण्याचे महत्त्व!’ हा शोधनिबंध सादर केला. त्याचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 18 राष्ट्रीय आणि 93 आंतरराष्ट्रीय, अशा एकूण 111 वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 13 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.

वास्तूशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार योग्य पदात (जागेत) असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. याउलट प्रवेशद्वार निषिद्ध पदात असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. हे वैज्ञानिक उपकरण वापरून केलेल्या प्रयोगातूनही दिसून आले. थोडक्यात वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होऊन व्यक्तीला सुख आणि शांती प्राप्त होते. वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण झाली, तरी ती टिकून राहणे हे घरात राहणार्‍या व्यक्तींच्या आचरणावर अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यास तिच्याकडून अयोग्य आचरण होऊन वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतात, याउलट व्यक्तीत चांगले गुण अधिक असल्यास तिच्याकडून योग्य आचरण होऊन वास्तूत सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. साधनेमुळे व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन सद्गुण वाढतात, तसेच व्यक्तीतील रज आणि तम हे गुण न्यून होऊन तिच्यात सत्त्वगुण वाढतो. याचा शुभ परिणाम वास्तूवर होऊन ती सकारात्मक (सात्त्विक) बनते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतांची वास्तू! संत साधनारत असल्याने ते ज्या वास्तूत निवास करतात, ती वास्तू सात्त्विक होते. त्यामुळे संतांचे जन्मस्थान, निवासस्थान, त्यांनी वापरलेल्या वस्तू इत्यादी जतन करण्याची परंपरा भारतात आहे. याबाबत संशोधनही मांडण्यात आले, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाचे आशिष सावंत यांनी म्हटले आहे.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content