Homeन्यूज ॲट अ ग्लांसदुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या कलिता माजी यांची गोष्ट आज संपूर्ण देशासाठी कौतुकाचा आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे. काही काळापूर्वीपर्यंत कलिता माजी यांचे आयुष्य अत्यंत साधे आणि कष्टप्रद होते. त्या दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करण्याचे काम करायच्या. महिन्याकाठी त्यांना अवघे २,५०० रुपये मिळायचे. त्यांचे पती प्लंबर म्हणून काम करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या कलिता यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, ज्या हातांनी त्यांनी आयुष्यभर इतरांच्या घरची भांडी घासली, तेच हात एके दिवशी विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडतील.

साधेपणाने जिंकली लोकांची मने

भारतीय जनता पार्टीने जेव्हा त्यांना औसग्राममधून उमेदवारी जाहीर केली, तेव्हा अनेकांसाठी तो आश्चर्याचा धक्का होता. पण कलिता डगमगल्या नाहीत. प्रचारादरम्यानही त्यांचा साधेपणा उठून दिसत होता. कोणताही मोठा लवाजमा नसताना, घरोघरी जाऊन त्यांनी लोकांशी संवाद साधला. “मी तुमच्यातीलच एक आहे आणि तुमचे प्रश्न मला ठाऊक आहेत,” हा त्यांचा प्रामाणिकपणा मतदारांच्या मनाला भिडला. आज त्यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही, तर प्रस्थापित राजकारण्यांना लोकशाहीची खरी ताकद काय असते, हे दाखवून दिले आहे.

लोकशाहीचा विजय

कलिता माजी यांचा विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून, तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा सन्मान आहे. एका झोपडीत राहणारी आणि घरकाम करणारी महिला जेव्हा राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचते, तेव्हा तो लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव ठरतो. “मला आता माझ्या मतदारसंघातील गरिबांसाठी आणि महिलांसाठी काम करायचे आहे,” अशी भावना त्यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे. कलिता माजी यांची ही यशोगाथा सांगते की, तुमची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा तुमची ध्येयाप्रती असलेली निष्ठा तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content