HomeArchiveबालभारती महाविद्यालयात 'सर्वोदय...

बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

Details
बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

    07-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.
 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.
 

 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.”
 

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.”
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.

 

 

“राष्ट्रपिता महात्मा गांधी””सर्वोदय उत्सव””मुंबईच्या कांदिवली पश्चिमबालभारती महाविद्यालय”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content