HomeArchiveबालभारती महाविद्यालयात 'सर्वोदय...

बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

Details
बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

    07-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.
 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.
 

 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.”
 

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.”
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.

 

 

“राष्ट्रपिता महात्मा गांधी””सर्वोदय उत्सव””मुंबईच्या कांदिवली पश्चिमबालभारती महाविद्यालय”

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content