HomeArchiveशासकीय योजनांपासून अल्पसंख्याक...

शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

Details
शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 
“शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content