HomeArchiveराजापूरच्या पुरातन वखारीचे...

राजापूरच्या पुरातन वखारीचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करा! पालकमंत्री रविंद्र वायकर यांची मागणी

Details
राजापूरच्या पुरातन वखारीचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करा! पालकमंत्री रविंद्र वायकर यांची मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या सौदर्यांत अधिक भर घालण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ब्रिटीशकालीन वखारीची पुर्नबांधणी करून तिचे पुरातन वस्तुसंग्रहालय व आर्ट गॅलरीमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी विनंती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून राजापूर येथे इ.स.१६४९ साली वखार बांधली. ही वखार १७०८ सालापासून बंद करण्यात आली आहे. या वखारीला ऐतिहासिक वारसा असल्याने राजापूर तालुक्याच्या विविध वैभवांपैकी एक, अशी तिची गणना करण्यात येते. असे असतानाही सद्य:स्थितीत ही वखार अतिशय जीर्ण झाली असून बंद स्थितीत आहे. ही वखार गृह खात्याच्या ताब्यात असून त्याचा पुनर्विकास करून त्याला गतवैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे. या वखारीची ऐतिहासिक ओळख कायम ठेवून याचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. याचा पुनर्विकास करताना पुरातन वास्तूचे बाह्यरुप, पदचिन्ह, रंगकामाचा दर्जा, इ. इस्ट इंडिया कंपनीने वखार बांधली, त्यानुसारच त्याचा पुनर्विकास केला पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्याची ओळख ही पर्यटन जिल्हा म्हणून असल्याने राजापुर येथील वखारीचा पुनर्विकास करताना त्या ठिकाणी पुरातन वस्तुसंग्रहालय, अद्यावत कलादालन इत्यादी निर्माण करण्याची गरज आहे, असे वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यास मदत तर होईलच, त्याचबरोबर राजापूरबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होईल, असे मत वायकर यांनी व्यक्त केले.

राजापूर येथे वेळोवेळी केलेल्या दौर्‍यात स्थानिक जनतेनेही याबाबत माझ्याकडे मागणी केली आहे. ही वखार गृह खात्याच्या अखत्यारित असल्याने, गृह खात्याचे प्रमुख या नात्याने या वास्तूचा पुनर्विकास करण्यासाठी पर्याप्त निधीची २०१९-२० च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही पालकमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या सौदर्यांत अधिक भर घालण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ब्रिटीशकालीन वखारीची पुर्नबांधणी करून तिचे पुरातन वस्तुसंग्रहालय व आर्ट गॅलरीमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी विनंती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून राजापूर येथे इ.स.१६४९ साली वखार बांधली. ही वखार १७०८ सालापासून बंद करण्यात आली आहे. या वखारीला ऐतिहासिक वारसा असल्याने राजापूर तालुक्याच्या विविध वैभवांपैकी एक, अशी तिची गणना करण्यात येते. असे असतानाही सद्य:स्थितीत ही वखार अतिशय जीर्ण झाली असून बंद स्थितीत आहे. ही वखार गृह खात्याच्या ताब्यात असून त्याचा पुनर्विकास करून त्याला गतवैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे. या वखारीची ऐतिहासिक ओळख कायम ठेवून याचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. याचा पुनर्विकास करताना पुरातन वास्तूचे बाह्यरुप, पदचिन्ह, रंगकामाचा दर्जा, इ. इस्ट इंडिया कंपनीने वखार बांधली, त्यानुसारच त्याचा पुनर्विकास केला पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्याची ओळख ही पर्यटन जिल्हा म्हणून असल्याने राजापुर येथील वखारीचा पुनर्विकास करताना त्या ठिकाणी पुरातन वस्तुसंग्रहालय, अद्यावत कलादालन इत्यादी निर्माण करण्याची गरज आहे, असे वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यास मदत तर होईलच, त्याचबरोबर राजापूरबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होईल, असे मत वायकर यांनी व्यक्त केले.

राजापूर येथे वेळोवेळी केलेल्या दौर्‍यात स्थानिक जनतेनेही याबाबत माझ्याकडे मागणी केली आहे. ही वखार गृह खात्याच्या अखत्यारित असल्याने, गृह खात्याचे प्रमुख या नात्याने या वास्तूचा पुनर्विकास करण्यासाठी पर्याप्त निधीची २०१९-२० च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही पालकमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content