HomeArchiveसरकारने शेतकऱ्यांना दिले...

सरकारने शेतकऱ्यांना दिले दिवसाकाठी फक्त १६ रूपये ६६ पैसे!

Details
सरकारने शेतकऱ्यांना दिले दिवसाकाठी फक्त १६ रूपये ६६ पैसे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शेतकऱ्याच्या वेषभूषेत विधानभवनात अवतरले आमदार प्रकाश गजभिये

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]

सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रूपये, म्हणजेच महिन्याला पाचशे तर दिवसाला 16 रूपये 66 पैसे देण्याची घोषणा केली खरी. पण राज्यातल्या अनेक शहरांत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली रक्कम, दोन हजार रूपये आली आणि लगेचच परत गेली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गरिब शेतकऱ्याची वेशभूषा करत विधानभवनात प्रवेश केला आणि सर्वांसाठीच ते आकर्षण ठरले.

त्यानंतर विधानभवन परिसरात बोलताना ते म्हणाले,
लाभले आम्हांस भाग्य, मुख्यमंत्री मराठी
विष घ्यावे लागते, कर्जमाफीसाठी
मंत्रालय झाले स्थळ, धर्माच्या आत्महत्त्येसाठी
जाहलो खरेच धन्य, आमचे भाग्य
रूपये 16 मिळणार, एक दिवसाकाठी
भाजप-सेना, तुम्ही खाता, तूप-लोणी
आम्हाला हवी चाराछावणी, नको लावणी
कर्जमाफी, कर्जमाफी द्या हो, मला
देवा देवेंद्रा, देवा उद्धवा, नका मारू मला..

 

या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये देण्यात आले. मात्र ही रक्कम लगेचच त्यांच्या खात्यातून परत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे पुन्हा एकदा झाले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती. मात्र राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देऊन निव्वळ चेष्टाच केली असल्याचा आरोपही गजभिये यांनी यावेळी केला.

सन 2015 व 16 च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र नंतर जनगणनेत ज्या शेतकऱ्यांच्या नावांची नोंद झाली त्यांना वंचित राहवे लागणार आहे. राज्यात साधी पाण्याची बाटली 20 रूपयांना मिळते. चहासुद्धा 20 रूपयांना मिळतो. वडापावसुद्धा 15 रूपयाला मिळतो तर शेतकरी १६ रूपये ६६ पैश्यात काय घेणार? एका कुटूंबात जर पाच सदस्य असतील तर प्रत्येकाला साडेतीन रूपये मिळतील. त्यात त्याने काय करावे, असा सवालही त्यांनी केला.”
 
“शेतकऱ्याच्या वेषभूषेत विधानभवनात अवतरले आमदार प्रकाश गजभिये

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]

सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रूपये, म्हणजेच महिन्याला पाचशे तर दिवसाला 16 रूपये 66 पैसे देण्याची घोषणा केली खरी. पण राज्यातल्या अनेक शहरांत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली रक्कम, दोन हजार रूपये आली आणि लगेचच परत गेली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गरिब शेतकऱ्याची वेशभूषा करत विधानभवनात प्रवेश केला आणि सर्वांसाठीच ते आकर्षण ठरले.

त्यानंतर विधानभवन परिसरात बोलताना ते म्हणाले,
लाभले आम्हांस भाग्य, मुख्यमंत्री मराठी
विष घ्यावे लागते, कर्जमाफीसाठी
मंत्रालय झाले स्थळ, धर्माच्या आत्महत्त्येसाठी
जाहलो खरेच धन्य, आमचे भाग्य
रूपये 16 मिळणार, एक दिवसाकाठी
भाजप-सेना, तुम्ही खाता, तूप-लोणी
आम्हाला हवी चाराछावणी, नको लावणी
कर्जमाफी, कर्जमाफी द्या हो, मला
देवा देवेंद्रा, देवा उद्धवा, नका मारू मला..

 

या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये देण्यात आले. मात्र ही रक्कम लगेचच त्यांच्या खात्यातून परत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे पुन्हा एकदा झाले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती. मात्र राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देऊन निव्वळ चेष्टाच केली असल्याचा आरोपही गजभिये यांनी यावेळी केला.

सन 2015 व 16 च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र नंतर जनगणनेत ज्या शेतकऱ्यांच्या नावांची नोंद झाली त्यांना वंचित राहवे लागणार आहे. राज्यात साधी पाण्याची बाटली 20 रूपयांना मिळते. चहासुद्धा 20 रूपयांना मिळतो. वडापावसुद्धा 15 रूपयाला मिळतो तर शेतकरी १६ रूपये ६६ पैश्यात काय घेणार? एका कुटूंबात जर पाच सदस्य असतील तर प्रत्येकाला साडेतीन रूपये मिळतील. त्यात त्याने काय करावे, असा सवालही त्यांनी केला.”
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content