Details
सरकारने शेतकऱ्यांना दिले दिवसाकाठी फक्त १६ रूपये ६६ पैसे!
01-Jul-2019
”
शेतकऱ्याच्या वेषभूषेत विधानभवनात अवतरले आमदार प्रकाश गजभिये
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रूपये, म्हणजेच महिन्याला पाचशे तर दिवसाला 16 रूपये 66 पैसे देण्याची घोषणा केली खरी. पण राज्यातल्या अनेक शहरांत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली रक्कम, दोन हजार रूपये आली आणि लगेचच परत गेली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गरिब शेतकऱ्याची वेशभूषा करत विधानभवनात प्रवेश केला आणि सर्वांसाठीच ते आकर्षण ठरले.
त्यानंतर विधानभवन परिसरात बोलताना ते म्हणाले,
लाभले आम्हांस भाग्य, मुख्यमंत्री मराठी
विष घ्यावे लागते, कर्जमाफीसाठी
मंत्रालय झाले स्थळ, धर्माच्या आत्महत्त्येसाठी
जाहलो खरेच धन्य, आमचे भाग्य
रूपये 16 मिळणार, एक दिवसाकाठी
भाजप-सेना, तुम्ही खाता, तूप-लोणी
आम्हाला हवी चाराछावणी, नको लावणी
कर्जमाफी, कर्जमाफी द्या हो, मला
देवा देवेंद्रा, देवा उद्धवा, नका मारू मला..
या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये देण्यात आले. मात्र ही रक्कम लगेचच त्यांच्या खात्यातून परत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे पुन्हा एकदा झाले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती. मात्र राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देऊन निव्वळ चेष्टाच केली असल्याचा आरोपही गजभिये यांनी यावेळी केला.
सन 2015 व 16 च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र नंतर जनगणनेत ज्या शेतकऱ्यांच्या नावांची नोंद झाली त्यांना वंचित राहवे लागणार आहे. राज्यात साधी पाण्याची बाटली 20 रूपयांना मिळते. चहासुद्धा 20 रूपयांना मिळतो. वडापावसुद्धा 15 रूपयाला मिळतो तर शेतकरी १६ रूपये ६६ पैश्यात काय घेणार? एका कुटूंबात जर पाच सदस्य असतील तर प्रत्येकाला साडेतीन रूपये मिळतील. त्यात त्याने काय करावे, असा सवालही त्यांनी केला.”
“शेतकऱ्याच्या वेषभूषेत विधानभवनात अवतरले आमदार प्रकाश गजभिये
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रूपये, म्हणजेच महिन्याला पाचशे तर दिवसाला 16 रूपये 66 पैसे देण्याची घोषणा केली खरी. पण राज्यातल्या अनेक शहरांत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली रक्कम, दोन हजार रूपये आली आणि लगेचच परत गेली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गरिब शेतकऱ्याची वेशभूषा करत विधानभवनात प्रवेश केला आणि सर्वांसाठीच ते आकर्षण ठरले.
त्यानंतर विधानभवन परिसरात बोलताना ते म्हणाले,
लाभले आम्हांस भाग्य, मुख्यमंत्री मराठी
विष घ्यावे लागते, कर्जमाफीसाठी
मंत्रालय झाले स्थळ, धर्माच्या आत्महत्त्येसाठी
जाहलो खरेच धन्य, आमचे भाग्य
रूपये 16 मिळणार, एक दिवसाकाठी
भाजप-सेना, तुम्ही खाता, तूप-लोणी
आम्हाला हवी चाराछावणी, नको लावणी
कर्जमाफी, कर्जमाफी द्या हो, मला
देवा देवेंद्रा, देवा उद्धवा, नका मारू मला..
या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये देण्यात आले. मात्र ही रक्कम लगेचच त्यांच्या खात्यातून परत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे पुन्हा एकदा झाले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती. मात्र राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देऊन निव्वळ चेष्टाच केली असल्याचा आरोपही गजभिये यांनी यावेळी केला.
सन 2015 व 16 च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र नंतर जनगणनेत ज्या शेतकऱ्यांच्या नावांची नोंद झाली त्यांना वंचित राहवे लागणार आहे. राज्यात साधी पाण्याची बाटली 20 रूपयांना मिळते. चहासुद्धा 20 रूपयांना मिळतो. वडापावसुद्धा 15 रूपयाला मिळतो तर शेतकरी १६ रूपये ६६ पैश्यात काय घेणार? एका कुटूंबात जर पाच सदस्य असतील तर प्रत्येकाला साडेतीन रूपये मिळतील. त्यात त्याने काय करावे, असा सवालही त्यांनी केला.”

