Details
ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.
”
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.
”