HomeArchiveराहुल शेवाळे यांचा...

राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित – आदित्य ठाकरे

Details
राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित – आदित्य ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईतले शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या रॅलीत, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सामील झाले. यावेळी ‘राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित असून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीला भरभरून मते मिळतील″ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तर “गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या झंजावातामुळे आम्ही जास्तीतजास्त जनतेपर्यंत पोहोचलो असून विजय निश्चित आहे” अशी प्रतिक्रिया उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिली.

 

यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश फातर्फेकर, तुकाराम काते, महिला विभाग संघटिका रिटा वाघ, श्रद्धा जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, आरपीयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नागसेन कांबळे, चंद्रशेखर कांबळे, कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुमारे 4 वाजता दादर परिसरात, राहुल शेवाळे यांच्या रॅलीत सहभागी झाले. यावेळी, “ही निवडणूक गल्लीची किंवा केवळ शहराची नसून देशाची निवडणूक आहे. त्यामुळे एनडीएला जास्तीतजास्त जागा मिळून शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सरकार देशात येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांची भव्य रॅली सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ट्रॉम्बे कोळीवाडा येथून सुरू झाली. शेकडो बाईक आणि चारचाकी वाहने घेऊन महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक या रॅलीत सहभागी झाले होते. ट्रॉम्बे येथून निघालेली ही रॅली देवनार, चेंबूर, चुनाभट्टी, सायन सर्कल, गुरू तेग बहाद्दूर नगर, अँटॉप हिल, वडाळा, महेश्वरी उद्यान, खोदादाद सर्कल, परळ टी. टी., एल्फिन्स्टन, प्रभादेवी, सेनाभवन, माटुंगा लेबर कॅम्प येथून धारावी येथे दाखल झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे ही रॅली मतदारसंघातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. अखेर धारावी येथे या रॅलीची सांगता झाली.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईतले शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या रॅलीत, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सामील झाले. यावेळी ‘राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित असून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीला भरभरून मते मिळतील″ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तर “गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या झंजावातामुळे आम्ही जास्तीतजास्त जनतेपर्यंत पोहोचलो असून विजय निश्चित आहे” अशी प्रतिक्रिया उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिली.

 

यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश फातर्फेकर, तुकाराम काते, महिला विभाग संघटिका रिटा वाघ, श्रद्धा जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, आरपीयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नागसेन कांबळे, चंद्रशेखर कांबळे, कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुमारे 4 वाजता दादर परिसरात, राहुल शेवाळे यांच्या रॅलीत सहभागी झाले. यावेळी, “ही निवडणूक गल्लीची किंवा केवळ शहराची नसून देशाची निवडणूक आहे. त्यामुळे एनडीएला जास्तीतजास्त जागा मिळून शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सरकार देशात येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांची भव्य रॅली सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ट्रॉम्बे कोळीवाडा येथून सुरू झाली. शेकडो बाईक आणि चारचाकी वाहने घेऊन महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक या रॅलीत सहभागी झाले होते. ट्रॉम्बे येथून निघालेली ही रॅली देवनार, चेंबूर, चुनाभट्टी, सायन सर्कल, गुरू तेग बहाद्दूर नगर, अँटॉप हिल, वडाळा, महेश्वरी उद्यान, खोदादाद सर्कल, परळ टी. टी., एल्फिन्स्टन, प्रभादेवी, सेनाभवन, माटुंगा लेबर कॅम्प येथून धारावी येथे दाखल झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे ही रॅली मतदारसंघातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. अखेर धारावी येथे या रॅलीची सांगता झाली.

 ”
 
 
 
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content