HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

Details
खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

 

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

 

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 
 ”
 
 
 

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content