HomeArchiveपुन्हा लोकसभेत 'जय...

पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

Details
पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

 

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

 

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content