HomeArchiveकोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर...

कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर झाली सकारात्मक चर्चा!

Details
कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर झाली सकारात्मक चर्चा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांच्या प्रश्नांवर नुकतीच विधान परिषदेत सकारात्मक चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मुंबई ते कांदिवलीपर्यंतच्या एकूण 29 कि.मी.च्या कोस्टल रोड संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नामुळे अनेक कोळी मच्छिमार बांधवांचे उदरनिर्वाह प्रश्न मार्गी लागणार आहेत. उदा. कोस्टल रोडमुळे बाधित झालेले किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांचे पुनर्वसन तसेच आर्थिक नुकसानभरपाई आणि जैवविविधतेचे होणारे नुकसान याबाबत सकारत्मक चर्चा झाली अशी माहिती पाटील यांनी दिली.

यावेळी वरळी सिलिंकचा स्पॅन वाढवुन द्यावा अशी मागणी केली गेली. तसेच संपूर्ण कोस्टल भागातील सीमांकन हद्द निश्चित करुन मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

 

मुंबईतील 42 कोळीवाड्यापैकी 12 कोळीवड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली. त्याबाबत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्नाबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांच्या प्रश्नांवर नुकतीच विधान परिषदेत सकारात्मक चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मुंबई ते कांदिवलीपर्यंतच्या एकूण 29 कि.मी.च्या कोस्टल रोड संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नामुळे अनेक कोळी मच्छिमार बांधवांचे उदरनिर्वाह प्रश्न मार्गी लागणार आहेत. उदा. कोस्टल रोडमुळे बाधित झालेले किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांचे पुनर्वसन तसेच आर्थिक नुकसानभरपाई आणि जैवविविधतेचे होणारे नुकसान याबाबत सकारत्मक चर्चा झाली अशी माहिती पाटील यांनी दिली.

यावेळी वरळी सिलिंकचा स्पॅन वाढवुन द्यावा अशी मागणी केली गेली. तसेच संपूर्ण कोस्टल भागातील सीमांकन हद्द निश्चित करुन मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

 

मुंबईतील 42 कोळीवाड्यापैकी 12 कोळीवड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली. त्याबाबत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्नाबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content