HomeArchiveमोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना...

मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

Details
मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content