HomeArchiveमहाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी...

महाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी उठविला दिल्लीत आवाज

Details
महाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी उठविला दिल्लीत आवाज

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो असा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करत खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय वने व पर्यावरण खात्याकडून संबंधित प्रकल्पांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचे गांभीर्य नमूद करताना कीर्तिकर यांनी सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर निधी व अडचणी नमूद केल्या. त्यामध्ये २०१५ ते २०१७ मध्ये राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांसाठी रू. ६,४९६ कोटी मंजूर झाले. परंतु वने व पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना उपरोक्त प्रकल्प मार्गी लागण्यास अडथळा येत असल्याचे संगितले. राज्यशासनाने ६ विविध प्रकल्पांसाठी मंजूर केलेला रू. १३३२ कोटींचा निधीदेखील पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना वापरात आणता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित प्रकल्पांना केंद्र शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश पाणीप्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो असा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करत खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय वने व पर्यावरण खात्याकडून संबंधित प्रकल्पांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचे गांभीर्य नमूद करताना कीर्तिकर यांनी सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर निधी व अडचणी नमूद केल्या. त्यामध्ये २०१५ ते २०१७ मध्ये राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांसाठी रू. ६,४९६ कोटी मंजूर झाले. परंतु वने व पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना उपरोक्त प्रकल्प मार्गी लागण्यास अडथळा येत असल्याचे संगितले. राज्यशासनाने ६ विविध प्रकल्पांसाठी मंजूर केलेला रू. १३३२ कोटींचा निधीदेखील पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना वापरात आणता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित प्रकल्पांना केंद्र शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश पाणीप्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content