HomeArchiveतिवरे धरण दुर्घटनेतील...

तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रविंद्र वायकर यांनी केले सांत्वन

Details
तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रविंद्र वायकर यांनी केले सांत्वन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तिवरे गावातील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चाही केली. पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना त्याचठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्घटनाग्रस्तांची दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसे करू शकतो. परंतु त्यास थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुनर्वसन करताना दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मुलभूत सोयी-सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील. या दुर्घटनेत उद्धस्त झालेले साकव, पूल, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, कूपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वांची नव्याने बांधणी व दुरूस्ती तत्काळ करणे गरजेचे असून आजुबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील. तुटलेल्या विजेचे खांब पुन्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तत्काळ देण्यात येतील. ज्यांची गुरेढोरे वाहून गेली असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुनर्वसन व अन्य समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, सं आश्वासन त्यांनी दिलं.

 
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ५०० चौरस फुटांचे घर मिळवून द्यावे अशी त्यांची मागणीही वायकर यांनी मान्य केली. बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही त्यांनी दिले. धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रूद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची १८ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून करण्याचे वचन त्यांनी दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेऊन त्यावर येणाऱ्या व्याजातून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवला जाईल. याठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल असेही वायकर म्हणाले.
 
या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आधार देण्याबरोबर कुटूंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री वायकर यांनी १९ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तत्पूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तिवरे गावातील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चाही केली. पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना त्याचठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्घटनाग्रस्तांची दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसे करू शकतो. परंतु त्यास थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुनर्वसन करताना दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मुलभूत सोयी-सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील. या दुर्घटनेत उद्धस्त झालेले साकव, पूल, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, कूपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वांची नव्याने बांधणी व दुरूस्ती तत्काळ करणे गरजेचे असून आजुबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील. तुटलेल्या विजेचे खांब पुन्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तत्काळ देण्यात येतील. ज्यांची गुरेढोरे वाहून गेली असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुनर्वसन व अन्य समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, सं आश्वासन त्यांनी दिलं.

 
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ५०० चौरस फुटांचे घर मिळवून द्यावे अशी त्यांची मागणीही वायकर यांनी मान्य केली. बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही त्यांनी दिले. धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रूद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची १८ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून करण्याचे वचन त्यांनी दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेऊन त्यावर येणाऱ्या व्याजातून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवला जाईल. याठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल असेही वायकर म्हणाले.
 
या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आधार देण्याबरोबर कुटूंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री वायकर यांनी १९ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तत्पूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 ”
 
 
 

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content