HomeArchiveतिवरे धरण दुर्घटनेतील...

तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रविंद्र वायकर यांनी केले सांत्वन

Details
तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रविंद्र वायकर यांनी केले सांत्वन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तिवरे गावातील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चाही केली. पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना त्याचठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्घटनाग्रस्तांची दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसे करू शकतो. परंतु त्यास थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुनर्वसन करताना दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मुलभूत सोयी-सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील. या दुर्घटनेत उद्धस्त झालेले साकव, पूल, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, कूपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वांची नव्याने बांधणी व दुरूस्ती तत्काळ करणे गरजेचे असून आजुबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील. तुटलेल्या विजेचे खांब पुन्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तत्काळ देण्यात येतील. ज्यांची गुरेढोरे वाहून गेली असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुनर्वसन व अन्य समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, सं आश्वासन त्यांनी दिलं.

 
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ५०० चौरस फुटांचे घर मिळवून द्यावे अशी त्यांची मागणीही वायकर यांनी मान्य केली. बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही त्यांनी दिले. धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रूद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची १८ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून करण्याचे वचन त्यांनी दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेऊन त्यावर येणाऱ्या व्याजातून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवला जाईल. याठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल असेही वायकर म्हणाले.
 
या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आधार देण्याबरोबर कुटूंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री वायकर यांनी १९ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तत्पूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तिवरे गावातील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चाही केली. पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना त्याचठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्घटनाग्रस्तांची दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसे करू शकतो. परंतु त्यास थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुनर्वसन करताना दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मुलभूत सोयी-सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील. या दुर्घटनेत उद्धस्त झालेले साकव, पूल, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, कूपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वांची नव्याने बांधणी व दुरूस्ती तत्काळ करणे गरजेचे असून आजुबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील. तुटलेल्या विजेचे खांब पुन्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तत्काळ देण्यात येतील. ज्यांची गुरेढोरे वाहून गेली असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुनर्वसन व अन्य समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, सं आश्वासन त्यांनी दिलं.

 
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ५०० चौरस फुटांचे घर मिळवून द्यावे अशी त्यांची मागणीही वायकर यांनी मान्य केली. बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही त्यांनी दिले. धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रूद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची १८ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून करण्याचे वचन त्यांनी दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेऊन त्यावर येणाऱ्या व्याजातून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवला जाईल. याठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल असेही वायकर म्हणाले.
 
या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आधार देण्याबरोबर कुटूंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री वायकर यांनी १९ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तत्पूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 ”
 
 
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content