HomeArchiveकलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी...

कलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी द्या – राहुल शेवाळे

Details
कलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी द्या – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुमारे 162 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस पुनर्विकासाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.

‘सेंट्रल युनिव्हर्सिटीज बिल 2019’ या विधयेकाच्या चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठीही केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाला 162 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार किंवा विद्यापीठाकडे इतका निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कलिना कॅम्पसचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी या पुनर्विकासासाठी त्वरित उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबतची समस्याही खासदार शेवाळे यांनी लोकसभेत मांडली. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 86 पदांपैकी 59 पदे रिक्त आहेत तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 129 पदांपैकी 57 पदे रिक्त आहेत. वास्तविक, विद्यापीठाला उत्पन्न नसल्याने आणि प्राध्यापकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागेल म्हणून ही रिक्त पदे भरली जात नसल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी सभागृहात मांडली. ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. कलिना कॅम्पसमधील डिस्टन्स एज्युकेशन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशेष स्पोर्ट्स पदवी अभ्यासक्रम यासाठीचे सरकारच्या विचाराधीन असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, असेही ते म्हणाले.

मुंबईतून केंद्र सरकारला सुमारे 40 टक्के महसूल जातो, त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि मुंबई विद्यापीठातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्यावा. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि पेपर तपासणीत बऱ्याचदा घोळ झाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या समस्यांना वाचा फोडली, याची आठवण करून देत केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाला बळकटी द्यावी, अशी मागणी खासदार शेवाळे केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुमारे 162 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस पुनर्विकासाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.

‘सेंट्रल युनिव्हर्सिटीज बिल 2019’ या विधयेकाच्या चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठीही केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाला 162 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार किंवा विद्यापीठाकडे इतका निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कलिना कॅम्पसचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी या पुनर्विकासासाठी त्वरित उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबतची समस्याही खासदार शेवाळे यांनी लोकसभेत मांडली. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 86 पदांपैकी 59 पदे रिक्त आहेत तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 129 पदांपैकी 57 पदे रिक्त आहेत. वास्तविक, विद्यापीठाला उत्पन्न नसल्याने आणि प्राध्यापकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागेल म्हणून ही रिक्त पदे भरली जात नसल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी सभागृहात मांडली. ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. कलिना कॅम्पसमधील डिस्टन्स एज्युकेशन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशेष स्पोर्ट्स पदवी अभ्यासक्रम यासाठीचे सरकारच्या विचाराधीन असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, असेही ते म्हणाले.

मुंबईतून केंद्र सरकारला सुमारे 40 टक्के महसूल जातो, त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि मुंबई विद्यापीठातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्यावा. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि पेपर तपासणीत बऱ्याचदा घोळ झाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या समस्यांना वाचा फोडली, याची आठवण करून देत केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाला बळकटी द्यावी, अशी मागणी खासदार शेवाळे केली.”
 

Continue reading

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास...

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...
Skip to content