HomeArchiveबारवी धरणाची उंची...

बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

Details
बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”

Continue reading

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...
Skip to content