HomeArchiveमुंबईतील भाजपा आमदार...

मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

Details
मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content